शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

जळगाव जिल्ह्यातील १३ तालुके दुष्काळाच्या दुसऱ्या निकषात पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 1:14 PM

एरंडोल, धरणगाव अपात्र

ठळक मुद्देआता सत्यमापनसत्यमापन प्रक्रिया आजपासून

जळगाव : केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्य शासनाने दुष्काळासाठी तयार केलेल्या पद्धतीच्या पहिल्या निकषात पात्र ठरलेल्या १२ तालुक्यांमध्ये पारोळा तालुक्याचा समावेश होऊन एकूण १३ तालुके गंभीर दुष्काळाच्या दुसºया निकषात पात्र ठरले आहेत. त्यामुळे या तालुक्यांमधील १० टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन माहिती भरण्याची (सत्यमापन) प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी बैठकीत दिले.जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणावर खंड पाडल्याने व ६३.८ पाऊस झालेला असल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट घेणार असून अनेक ठिकाणी पिके हातची गेली आहेत. त्यामुळे जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी होत असताना केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्य शासनाने पद्धती तयार केली असल्याने त्याअनुषंगानेच निकष लावून दुष्काळ घोषीत करण्यात येणार आहे. त्यातील सप्टेंबर अखेर ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस झालेले १२ तालुके दुष्काळाच्या पहिल्या निकषात (ट्रिगर) पात्र झाले आहेत, तर पारोळा, एरंडोल व धरणगाव हे तालुके अपात्र ठरले. मात्र दुसºया निकषात त्यात आणखी पारोळा तालुक्याचा समावेश झाला आहे. एकूण १३ तालुके गंभीर दुष्काळाच्या निकषात पात्र ठरले आहेत. दुसºया निकषासाठी वनस्पती निर्देशांक, जलनिर्देशांक, पेरणीक्षेत्र आदी निकषांपैकी किमान तीन निकषांमध्ये पात्र ठरलेल्या तालुक्यांना पात्र धरण्यात आले आहे.सत्यमापन प्रक्रिया आजपासून१० टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन माहिती भरण्याची (सत्यमापन) प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी बैठकीत दिले.गुरूवारी याबाबत पात्र ठरलेले अमळनेर, पारोळा, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, रावेर, यावल या सर्व तालुक्यांमधील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आदी उपस्थित होते. त्यांना त्यांच्या तालुक्यांमधील १० टक्के गावे निवडून देण्यात आली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalgaonजळगाव