शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
3
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
4
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
5
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
6
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
7
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
8
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
9
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
10
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
11
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
12
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
13
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
14
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
15
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
16
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
17
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
18
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
19
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
20
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू

गायरानधारकांचा प्रश्न मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:57 IST

जालना : जिल्ह्यातील गायरानधारकांच्या हक्काच्या जमिनी त्यांच्या नावे करण्यात याव्यात, ही खूप वर्षांपासूनची मागणी होती; परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष ...

जालना : जिल्ह्यातील गायरानधारकांच्या हक्काच्या जमिनी त्यांच्या नावे करण्यात याव्यात, ही खूप वर्षांपासूनची मागणी होती; परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. भविष्यात जिल्हाभरातील गायरानधारकांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी भूमिका राष्ट्रीय निवारा परिषदेचे प्रमुख डी.डी. गायकवाड यांनी मांडली.

राष्ट्रीय निवारा परिषदेचे प्रमुख डी.डी. गायकवाड हे मंगळवारी जालना येथे आले असता त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून आतापर्यंत गायरान जमिनी नावावर करण्यात आल्या नाहीत. शासनाकडून एकप्रकारे गाजर दाखवण्याचे काम करण्यात येत आहे. जोपर्यंत गरीब-वंचितांच्या गायरान जमिनी नावावर होत नाही, तोपर्यंत संघटना पाठीमागे हटणार नाही. यासाठी वाटेल ते करावे लागले तरी चालेल. संघटनेच्या माध्यमातून स्थलांतरित मजूर भाडेकरूंना शासनाने भूखंड देऊन पुनर्वसन करावे, लाइटहाउसच्या धर्तीवर गृहनिर्माण सोसायट्या तयार कराव्यात, अशा मागण्या करून आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून गायरान प्रश्न, भाडेकरूंना हक्काचे घर यासह अनेक गरीब-वंचितांचे प्रश्न सोडवण्यावर संघटनेचा भर असल्याचे डी.डी.गायकवाड म्हणाले.

यावेळी मराठवाडा प्रमुख संतोष तुपसौंदर, जिल्हाध्यक्ष पैत्रज भालेराव आदींची उपस्थिती होती.