शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातील पाणी जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:52 IST

जायकवाडी प्रकल्पात ८३ टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला असून, प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून ४०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : जायकवाडी प्रकल्पात ८३ टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला असून, प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून ४०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी अंबड तालुक्यातील वडीगोद्रीसह इतर गावांमधील कॅनॉलमध्ये सोमवारी दाखल झाले. कॅनॉलला पाणी आल्याने या भागातील हजारो हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असून, दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.जालना जिल्ह्यात यंदा अपेक्षित असा मोठा पाऊस झालेला नाही. अंबड व घनसावंगी तालुक्यातही परिस्थिती तशीच आहे. पावसाअभावी काही ठिकाणी खरिपाची दुबार पेरणी झाली. गत काही दिवसांमध्ये पडलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. परंतु फळबाग व ऊस पिकासाठी अधिक पावसाची गरज आहे. गोदाकाठच्या गावात आजही जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तीव्र असून, गावा-गावातील पाणीटंचाईही कायम आहे. जायकवाडी जलाशयातून शेतीसाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. नाशिक व अहमदनगर परिसरात मोठया प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे मराठवाडयासाठी जीवनदायिनी असलेला जायकवाडी प्रकल्पात ८३ टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्याने डाव्या कालव्यातून ४०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. पाणी दाखल झाल्याने शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.या गावच्या शिवारात पाणीअंबड तालुक्यातील भांबेरी, दह्याला, नालेगाव, अंतरवाली, सराटी, वडीगोद्री, आपेगाव, बळेगाव, साष्ट पिंपळगाव, चुर्मापुरी, महाकाळा, पाथरवाला खुर्द, बुद्रूक, घुंगर्डे हादगाव, करंजला, पिठोरी शिरसगाव, एकलहेरा, तीर्थपुरी, भारडी आदी गावांना डाव्या कालवा व त्याच्या वितरिकांमार्फत पाणीपुरवठा केला जातो.या गावांच्या शिवारातील लाखो हेक्टरवरील पिकांना या पाण्याचा लाभ होणार आहे. शिवाय जनावरांच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागणार आहे.मोठ्या पावसाची प्रतीक्षादमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ठणठणाट कायम असून, इतर जलस्त्रोतांची अवस्थाही बिकट आहे. पाणीप्रश्न मार्गी लागण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमआहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीdroughtदुष्काळAgriculture Sectorशेती क्षेत्र