शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

रोहिलागड येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST

रोहिलागड गावाची लोकसंख्या सात हजारांपेक्षा अधिक आहे. गावाला ग्रामपंचायतीच्या नऊ विहिरी आहेत. तीन पाइपलाइन असून, नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला ...

रोहिलागड गावाची लोकसंख्या सात हजारांपेक्षा अधिक आहे. गावाला ग्रामपंचायतीच्या नऊ विहिरी आहेत. तीन पाइपलाइन असून, नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस झाला. यामुळे विहिरी तुडुंब भरल्या आहेत. परिणामी, पाण्याचा प्रश्न सुटला आहे. असे असतानाही गावात मागील १२ दिवसांपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने विद्युत मोटार सुरू होत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. याबाबत अंबड येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली; परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मुबलक पाणीसाठा असतानाही नागरिकांना शेंदून पाणी आणावे लागत आहे. काही ग्रामस्थांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. याबाबत वीज वितरणचे उपअभियंता दारकोंडे यांना विचारले असता, त्यांनी चौकशी करून सांगतो, असे सांगितले. परिसरात दरवर्षी दुष्काळी परिस्थिती असते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंंती करावी लागते. यंदा चांगला पाऊस झाल्याने पाणीटंचाईचा प्रश्न सुटला होता; परंतु आता विजेअभावी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.