शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
6
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
7
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
8
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
9
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
10
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
11
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
12
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
13
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
14
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
15
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
16
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
17
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
18
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
19
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
20
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना उदय,कहर अन् अस्ताकडे वाटचाल - मागोवा २०२०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:23 IST

चौकट हे महत्वाचे कार्यक्रम पार पडले अन्... २०२० या वर्षाचा ढोबळपणे आढावा घेतांना जानेवारी, फेब्रुवारी हे दोन महिने नाॅर्मल ...

चौकट

हे महत्वाचे कार्यक्रम पार पडले अन्...

२०२० या वर्षाचा ढोबळपणे आढावा घेतांना जानेवारी, फेब्रुवारी हे दोन महिने नाॅर्मल गेले. मार्चमध्ये मात्र कोरोनाची चाहूल लागली होती. या वर्षात जालन्यातील नाट्यांकुरचा बालनाट्य महोत्सव उत्साहात पार पडला. एक आणि दोन फेब्रुवारीला प्रतिभा संगम साहित्य संमेलनही जोरात झाले. मार्चमध्ये जर्मन डॉक्टरांनी येथील मिशन हॉस्पिटलमध्ये ओठ फाटणे, टाळू चिकटण्याच्या आजारावर यशस्वी शस्त्रक्रियाही केल्या. १४ आणि १५ मार्चला विद्रोही साहित्य संमेलनही थाटात होऊन वैचारिक मंथन झाले. परंतु २२ मार्च नंतर संचारबंदी सुरू झाली आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. ७ मे नंतर उद्योगांची चाके फिरण्यास प्रारंभ झाला परंतु आजही केवळ स्टील उद्योग वगळता अन्य उद्योग अडचणींचा सामना करून आपले अस्तित्व टिकवून आहेत.

चौकट

कामगारांचे जथ्थे पायी

अन्य आजारांप्रमाणे कोरोनानेही गरीब, श्रीमंत हा भेद ठेवला नाही. त्यामुळे घराबाहेर न पडणाऱ्यांनाही काेराेनाची लागण होऊन अनेकांना जीव गमवावे लागले. जालन्यात १३ हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, जवळपास ३४३ जणांचे बळी या आजाराने घेतले आहेत. जालन्यातील विविध उद्योगातील कामगारांनी पाठविण्याची व्यवस्था करूनही पायी वारीव्दारे हजारो किलोमीटरचा प्रवास करून गाव गाठले.

चौकट

अपघात आणि स्फोटाने हळहळ

जालन्यातील कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाला गुंगारा देत रेल्वे रूळाव्दारे पायी औरंगाबादकडे जात असतांना वाटेत रेल्वे रूळावर झोपले होते. त्यावेळी मालगाडीने जवळपास १६ कामगारांना चिरडले होते. त्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. तसेच अन्य एका स्टील उद्योगात भट्टीचा स्फोट होऊन १३ कामगारांचा मृत्यू ही देखील एक भळभळती जखम उद्योग आणि कामगार क्षेत्रात ताजी आहे.

चौकट

काेराेनामुळे लॅब, ऑक्सिजन प्लँटची उभारणी

कोरोनाची चाचणी करण्यासाठी येथे दहा कोटी रूपये खर्च करून स्वतंत्र लॅब उभारली आहे. तसेच दोन ऑक्सिजन प्लँट उभारले असून, जिल्हा रूग्णालयांसह अन्य रूग्णालयांचा कायापालट झाला आहे. यासाठी जालन्यातील स्टील, बियाणे उद्योगांप्रमाणेच अन्य उद्योजक, व्यापाऱ्यांनी मोठी आर्थिक मदत केल्यानेच हे शक्य झाले. लॅबसह अन्य वैद्यकीय सुविधेसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोठे सहकार्य लाभले.

अन्नदानाचा महयज्ञ

कोरोना काळात जालन्यातील विविध संस्था, दानशूर व्यक्ती, रोटरी क्लब, लायन्स क्लब, दत्ताश्रम संस्थान, अन्नामृत, आनंदी स्वामी मंदिर, स्वामी समर्थ सेवा शिष्य परिवार, आ. कैलास गोरंट्याल यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेले भूदेवी अन्नछत्र, शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी केलेली कोरोना जागृती तसेच अन्नदानानेही गाेरगरिबांना मोठी मदत केली.

चौकट

उद्योजकांकडून भरीव मदत

कोरोना काळात कोविड हॉस्पिटलची उभारणी करण्यासह व्हेंटिलेटर खरेदी करणे, ऑक्सिजन प्लँटची उभारणी करण्यासाठी मोठी मदत येथील उद्योजकांनी केली. येथील स्टील निर्माता असोसिएशनने अडीच कोटी रूपये दिले. तर महिकोने ऑक्सिजन प्लँटसाठी ६० लाख रूपये दिले आहेत. यासह अन्य बियाणे,खत उद्योजकांनी देखील आर्थिक मदत केल्याने प्रशासनास मोठा हातभार लागला.

चौकट

कोविड योद्धयांचे योगदान

ऐन कोराेना काळात डॉक्टर, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा प्रशासन, परिचारिका तसेच आयएमए या संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले जीव धोक्यात घालून नागरिकांना मोठी मदत केली. पोलीस प्रशासनाचाही यात सिंहाचा वाटा आहे.