शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
2
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
3
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
केंब्रिजमधून M. Phi, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
5
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
6
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
7
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
8
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
9
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
10
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
11
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
12
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
13
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
14
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
16
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण

परतीच्या पावसाचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 1:05 AM

बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४८.७५ मिमी पाऊस झाला असून, ११ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना / भोकरदन : बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४८.७५ मिमी पाऊस झाला असून, ११ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. दरम्यान, या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मात्र, मोठा फटका बसला आहे. भोकरदन तालुक्यातील बेलोरा येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची एक बाजू पाण्यामुळे वाहून गेली आहे. तर जालना शहराला पाणीपुरवठा करणाºया घाणेवाडी प्रकल्पात ६ फुटांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला.जिल्ह्यात गत आठवड्यापासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भोकरदन तालुक्यातील केळना, पूर्णा, गिरजा, रायघोळ, धामणा, जुई या सर्व नद्यांना पूर आला होता. तर बेलोरा येथील बंधा-याला सिंचन विभागाने गेट टाकलेले आहेत. त्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे हा बंधारा एका बाजूने वाहून गेला. त्यामुळे येथील शेतकरी दशरथ श्रीपत कोल्हे यांचे अर्धा एकर शेती वाहून गेली. तसेच गजानन सुखदेव कोल्हे, पंजाब सारंगधर बदर, रमेश शिंदे या तीन शेतकऱ्यांच्या बंधा-याच्या लगत नदीच्या काठावर असलेल्या विहिरी गाळामुळे गायब झाल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे १२ ते १५ लाख रूपयाचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या पावसामुळे मका, सोयाबीन, कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.अभियंत्यांनी केली पाहणीबेलोरा बंधारा वाहून गेल्याची माहिती जलसंधारण विभागाचे उपअभियंता आऱ के़जाधव, अंबादास सहाने यांना देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ बेलोरा येथे जाऊन पाहणी केली.या मंडळांत झाली अतिवृष्टीजालना तालुक्यातील रामनगर महसूल मंडळात ८४ मिमी, विरेगाव ९४ मिमी, पचनवडगाव ६५ मिमी, वाघ्रूळ जहागीर ११० मिमी, बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी ८० मिमी, भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार ९५ मिमी, राजूर ७९ मिमी, केदारखेडा ८१ मिमी, अनवा १३० मिमी, परतूर महसूल मंडळात ७८ मिमी तर अंबड, वडीगोद्री महसूल मंडळात ९८ मिमी पाऊस झाला.‘खडकपूर्णा’तून ५८ हजार क्युसेसचा विसर्गतळणी : विदर्भातील खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे बुधवारी सायंकाळी उघडण्यात आले असून, पूर्णा नदीपात्रात ५८ हजार ३१३ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाण्याची आवक वाढल्याने मंठा तालुक्यातील पूर्णा नदीवरील पूर्णा पाटी, वझर सरकटे व उस्वद येथील कोल्हापुरी बंधा-यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे बंधा-याच्या बाजूचा भराव वाहून जाण्याबरोबर शेतात पाणी घुसून शेतजमीन व पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तिन्ही बंधा-यांची पाटबंधारे व मंठा तहसीलच्या अधिकारी व कर्मचाºयांनी पाहणी केल्याचे उस्वद येथील माजी सरपंच राम चट्टे, वामन देशमुख, संतोष सरकटे, अशोक सरकटे यांनी सांगितले.जामवाडीनजीकच्या पुलाचा सापळा गेला वाहूनजालना शहरापासून जवळच असलेल्या जामवाडी गावाजवळील हॉटेल युवराज जवळ नव्यानेच एक पूल बांधण्यात येत आहे. बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे या पुलाचा सापळा वाहून गेला. ही घटना सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे जालना ते देऊळगावराजा या दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक नंतर सिंदखेड राजा आणि भोकरदन मार्गे वळविण्यात आली. पूल वाहून गेल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाडेकर यांनी जिल्हा प्रशासनाला कळविली. त्यानंतर खबरदारी घेण्यात आली.जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडून पाहणी : बंधा-यावरील २० गेट काढलेकेदारखेडा : येथील पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधारा मंगळवारी मध्यरात्री ओव्हरफ्लो झाला. पाण्याचा वेग वाढल्याने बंधा-याचे पाणी शेजारील शेतशिवारात गेले. त्यामुळे या भागातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. बंधा-याच्या पाण्याची धार नदीकाठावरील पंढरीनाथ तांबडे यांच्या शेतातून पडल्याने कपाशीसह जमिनीतील माती वाहून गेली.याची दखल घेत जलसंधारण खात्याच्या अधिका-यांनी मंगळवारी दुपारी केदारखेडा कोल्हापुरी बंधा-याचे २० गेट काढले होते. बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी या बंधा-याची पाहणी केली. यावेळी जलसंधारणचे उपविभागीय अधिकारी आर.के.जाधव, अंबादास सहाने आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :RainपाऊसriverनदीfloodपूरDamधरणagricultureशेती