शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्प उर्वरित प्रतिक्रीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:57 IST

आज मांडल्या गेलेल्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये जे प्रत्येक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात होते त्यामध्ये ...

आज मांडल्या गेलेल्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये जे प्रत्येक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात होते त्यामध्ये ७५ हजार कोटी रुपयांवरून ६५ हजार कोटी रुपये इतकी कपात करण्यात आली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना प्राप्त होणाऱ्या तुटपुंज्या लाभापासून वंचित ठेवण्यासारखे आहे. याबरोबरच एम.एस.पी. दीडपट दिली जाणार अशी घोषणा केली गेली; परंतु वस्तुस्थिती एम.एस.पी.साठीची तरतूद दीडपट केली जाणार आहे. हा शब्दांचा खेळ आहे. विमा क्षेत्रात ७४ टक्क्यांपर्यंत विदेशी गुंतवणूक केली जाऊ शकेल, आजपर्यंत ही मर्यादा ४९ टक्के इतकी होती. यामुळे विमा क्षेत्र विदेशी खाजगी भांडवलदारांच्या हाती जाईल.

सरकारच्या माध्यमातून रेल्वे, एअरपोर्ट, रस्ते, वीज, शेती, वेअर हाऊसेस, बंदरे, यासह तेवीस सार्वजनिक उपक्रमांची विक्री केली जात आहे. हे देशातील सुजाण नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे. एकूणच हा अर्थसंकल्प भ्रमनिरास करणारा आहे.

-डॉ मारोती तेगमपुरे,

अर्थशास्त्र विभागप्रमुख,

गोदावरी महाविद्यालय, अंबड, जि. जालना

...................

ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक व निवृत्तीधारकांना आयकर विवरणपत्र दाखल करण्याची गरज नाही. आयकर तपासणी फक्त तीन वर्षांपर्यंत मागे जाऊन करता येणार आहे. छोट्या करदात्यांसाठी नवीन फेसलेस योजना आणली आहे. सरकारचा खर्च हा उत्पन्नापेक्षा ९.५ टक्के जास्त झाल्याने सरकार ती भरपाई संपत्ती विकून पूर्ण करणार आहे. एकूणच जीएसटी कायद्यातही अनेक सकारात्मक बदल केले आहेत.

-डॉ. चंद्रशेखर चोबे

कर सल्लागार

....................

पायाभूत सुविधांवर भर

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा वाढीसाठी मोठी तरतूद केली आहे. त्यामुळे आशेचा नवीन किरण समोर आला आहे. शिक्षण, आरोग्य, वाहतूक यावरही भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे कर सवलत वगळता हा अर्थसंकल्प सर्वार्थाने चांगला म्हणावा लागेल.

-निखिल बाहेती, सी.ए.

...................

पारदर्शकतेला महत्त्व

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात डिजिटल व्यवहारांना महत्त्व देऊन पारदर्शकता आणण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य म्हणावा लागेल, चैनीच्या वस्तूंच्या किमती वाढविल्याने त्यातून कर मिळण्यास अधिक वाव आहे, सैनिकी शाळा, एकलव्य योजना आणि जनगणना हे देखील चांगले उपक्रम म्हणावे लागतील.

-प्रा. सुखदेव मांटे

...............