शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पितृपंधरवड्यात भोपळा खातोय भाव; जालन्यातील मुख्य भाजीमंडीत ४० तर फेरीवाल्यांकडे ६० रुपये किलोचा दर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:32 IST

जालना : जिल्ह्यात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यात पितृपंधरवाड्यात भोपळ्यालाही मागणी वाढल्याने बाजारपेठेतील दर ४० ...

जालना : जिल्ह्यात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यात पितृपंधरवाड्यात भोपळ्यालाही मागणी वाढल्याने बाजारपेठेतील दर ४० रुपये किलोवर गेले आहेत. तर फेरीवाल्यांकडून घरासमोर चक्क ६० रुपये किलोने भोपळा विक्री होत आहे.

जिल्ह्याच्या विविध भागांत मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. पडणाऱ्या पावसामुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीचा फटका भाजीपाल्याच्या उत्पादनालाही बसला आहे. परिणामी, बाजारपेठेत नियमित होणारी भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. भाजीपाल्याची आवक मंदावल्याने बाजारपेठेतील दरही काही अंशी वाढले आहेत. तर घरासमोर भाजीपाला विक्री करणारे फेरीवाले अधिकचा दर घेत आहेत.

व्यापारी काय म्हणतात?

सध्या बाजारपेठेत भाजीपाल्याची होणारी आवक मंदावली आहे. त्यामुळे दर काहीसे वाढले आहेत. शिवाय ग्रामीण भागातून भाजीपाला आणून शहरी भागात विक्री करायचा म्हटले की वाहतुकीचा खर्च वाढतो. भाजीपाल्याच्या साठवणुकीसाठीही खर्च करावा लागतो. त्यामुळे आम्हाला बाजारपेठेत काही प्रमाणात दर वाढवून भाजीपाल्याची विक्री करावी लागते.

- नितीन चव्हाण

भाजीपाल्याची मुख्य बाजारपेठेतून किंवा ग्रामीण भागातून खरेदी करावी लागते. त्याची साठवणूक, वाहतूक यावरही व्यापाऱ्यांचा खर्च होतो. अतिवृष्टीचा परिणामही भाजीपाला उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दर वाढले आहेत. फेरीवाले शहरातील विविध भागांत फिरून भाजीपाला विक्री करतात. त्यामुळे त्यांच्याकडून काहीसी दरवाढ होते.

- प्रकाश जईद

अर्धा-एक किलोसाठी बाजारात कोण जाणार?

सध्या सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत जाऊन भाजीपाला खरेदी करताना मोठी कसरत करावी लागते. त्यात पाऊस आला की मोठी गैरसोय होते. त्यामुळे बहुतांशवेळी आम्ही घरासमोर येणारा भाजीपाला खरेदी करण्यावर भर देतो. त्यामुळे भाजीपाला आणण्यासाठी बाजारपेठेत जाण्या- येण्याचा वेळ वाचतो शिवाय इतर त्रासही कमी होतो.

- दीपाली खवल

बाजारपेठेपेक्षा फेरीवाले अधिक दराने भाजीपाला विक्री करतात. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यात इंधनासह इतर साहित्याची दरवाढ होत असल्याने आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले आहे. असे असले तरी भाजीपाला खरेदी करावाच लागतो. ही बाब पाहता फेरीवाल्यांनी अधिकचा दर घेऊ नये.

- रागिणी राखे

मागणी वाढली....

सध्या पितृपंधरवाडा सुरू असून, या काळात भाजीपाल्याला अधिक मागणी वाढली आहे.

वाढलेली मागणी आणि बाजारपेठेतील घट यामुळे दरात वाढ होत आहे.

बाजारपेठेपेक्षा फेरीवाले अधिकचा दर घेत असल्याचे दिसून येते.