शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

बैलाला सोन्याचा भाव; पारडगावच्या बाजारात अर्ध्या लाखाला मिळतेय जोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST

जालना : शेतीला आधुनिकतेची जोड मिळाली. यांत्रिकीकरण झाले; परंतु आजही अनेक शेतकरी बैलांचा वापर करून शेती कसतात. दुधाळ जनावरे ...

जालना : शेतीला आधुनिकतेची जोड मिळाली. यांत्रिकीकरण झाले; परंतु आजही अनेक शेतकरी बैलांचा वापर करून शेती कसतात. दुधाळ जनावरे पाळणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पारडगाव (ता. घनसावंगी) येथील बाजारात शेतातील ओढकाम करणाऱ्या बैलांची जोडी सध्या ६० हजार ते एक लाखापर्यंत विक्री होत आहे.

पारंपरिक शेतीला फाटा देत अनेकांनी आधुनिकतेची कास धरून शेती व्यवसाय सुरू केला आहे. असे असले तरी बैलांचा शेतीकामासाठी वापर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. शिवाय गायी, म्हशी या दुधाळ जनावरांचेही पालन शहरी, ग्रामीण भागात केले जाते. गत काही वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला. कधी चारा-पाण्याचा प्रश्न, तर कधी रोगराई यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. पशुधनाची संख्या कमी झाली असली तरी त्यांचे बाजारातील दर चांगलेच वाढले आहेत. पारडगावसह जिल्ह्यातील इतर आठवडी बाजारांमध्ये जनावरांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते.

दोन कोटींची उलाढाल

घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील जनावरांचा बाजार जिल्ह्यात नव्हे मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. या आठवडी बाजारात जालना, बुलडाणा, परभणी, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यातील पशुपालक, व्यापारी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी येतात. दुधाळ जनावरांसह ओढकाम करणाऱ्या जनावरांची खरेदी-विक्री या बाजारात होते. सध्या जनावरांची खरेदी- विक्री पूर्वीपेक्षा कमी झाली आहे; परंतु जनावरांच्या खरेदी-विक्रीचे दर ४० हजार ते ८० हजारांपर्यंत जात आहेत. एका आठवडी बाजारात दीड ते दोन कोटीपर्यंत आर्थिक उलाढाल होते.

जनावरे सांभाळणे झाले कठीण

गत काही वर्षांत जनावरांची संख्या घटली आहे. असे असले तरी बाजारात जनावरांची संख्या वाढली असून, चाऱ्यासह इतर समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

- जनार्दन माकोडे, पारडगाव

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अनेक वेळा गंभीर होतो. शिवाय जनावरे सांभाळण्यासाठी मनुष्यबळ मिळत नाही. इतर नैसर्गिक आपत्तींचाही सामना करावा लागतो.

-महेश जगधने, जामखेड

पूर्वी मोठ्या प्रमाणात गायरान जमीन उपलब्ध असल्याने चाऱ्याचा प्रश्न कमी होता. गायरान क्षेत्र घटल्याने चाऱ्याचा प्रश्न अनेक वेळा गंभीर हेातो.

-रामभाऊ चांडक, पारडगाव

दुधाळ जनावरांची मागणी घटली

जनावरांच्या चाऱ्याचा प्रमुख प्रश्न शेतकरी, पशुपालकांसमोर उभा राहिला आहे.

चाऱ्याच्या प्रश्नामुळे सध्या दुधाळ जनावरांना बाजारातील मागणी घटली आहे. बाजारात पशुपालक जरशी गायींना पसंती देत आहेत.

दुधाळ जनावरांची विक्री ३० ते ९० हजार रुपयांपर्यंत खरेदी-विक्री होत आहे.

दुधाळ जनावरांची घटणारी संख्या पाहता दुधाचे दरही शहरी, ग्रामीण भागात वाढताना दिसून येत आहेत.

बैलजोडीचा दिवसाचा खर्च

शेतकरी, पशुपालक स्वत: जनावरे सांभाळत असेल तर त्याचा खर्च कमी येतो. शेतातील कडबा नसेल तर कडबा, पेंड विकत आणावी लागते. जर शेती नसेल तर कडबा, पेंड, पाणी आदी बाबींवर खर्च करावा लागतो. सालगडी असेल तर दोन ते अडीच लाखांपर्यंत खर्च वर्षाकाठी होतो.

परतूर तालुक्यातील शेवगा येथील शेतकरी रानोजी कराडे यांची बैलजोडी.