शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
2
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
3
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
4
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
5
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
6
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
7
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
8
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
9
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
10
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
11
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
12
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
13
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
14
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
15
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
16
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
17
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
18
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
19
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
20
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

"... तेव्हा पाटील दादांकडे कुणीही आलं नाही", तृप्ती देसाईंचा जालन्यातून इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 22:06 IST

राज्यातील सर्वपक्षीय बड्या नेत्यांनी अंतरवालीत भेट दिल्यानंतर अद्यापही तेथे गर्दी कमी होताना दिसत नाही

जालना - अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाचा आज नववा दिवस असून, बुधवारी सकाळी ८ वाजता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणस्थळी असलेल्या डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावून उपचार केले. अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी प्रमाणपत्राबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. मात्र, अद्यापही अंतरवाली येथे नेतेमंडळी आणि संघटनाच्या पदाधिकाऱ्यांच्य भेटी सुरूच आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली. 

राज्यातील सर्वपक्षीय बड्या नेत्यांनी अंतरवालीत भेट दिल्यानंतर अद्यापही तेथे गर्दी कमी होताना दिसत नाही. याउलट मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा वाढत आहे. तृप्ती देसाई यांनीही येथे भेट देत सरकारला इशारा दिला. तसेच, भेटी देणाऱ्या नेत्यांवरही टीका केली. 

जेव्हा पाटील दादा उपोषणाला बसले तेव्हा कुणीच नाही आलं, जेव्हा राज्यभरात वातावरण पेटायला लागलं. जेव्हा मीडियात बातम्या यायला लागल्या तेव्हा सगळे नेते इकडं यायला लागले. इथल्या आजुबाजूच्या मतदारसंघातील नेतेही इकडे फिरकले नव्हते. पण, आता राज्यभर हा मुद्दा गाजतोय म्हटल्यावर, आपण तिथं जाऊन बसलं पाहिजे असं वाटल्यानेच ही नेतेमंडळी आली, असे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी म्हटलं.

हे आंदोलन म्हणजे गरिब माणसांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. सरकारने ताबडतोब जीआर काढावा, यांना जर काही झालं कमी जास्त, तर मी मंत्रालयात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही. मग, मला ९० दिवस तुरुंगात जावं लागलं तरी चालेल, असे म्हणत तृप्ती देसाई यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. 

मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षण संदर्भात निर्णय घेतला. आरक्षणासाठी आम्ही पाच न्यायाधीशांची समिती गठीत केली. ही समिती आरक्षणाबाबत पुराव्यांची पडताळणी करेल. निवृत्त न्यायाधिशांची ही समिती असेल. निजामकालीन नोंदींना कुणबी प्रमाणपत्र देणार आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.  

मनोज जरांगेची घोषणा

निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठा समाज बांधवांना तत्काळ कुणबी दाखले देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असा शासनाचा निरोप माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे यांनी बुधवारी रात्री उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना दिला. शासनाच्या निर्णयावर आपण सहकाऱ्यांसमवेत चर्चा करुन गुरूवारी सकाळी ११ वाजता आमरण उपोषणाबाबतचा आपला निर्णय जाहीर करू, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.

गावकऱ्यांनी ठरवली आचारसंहिता

समन्वय समिती प्रशासनाच्या संपर्कात आहे. गावात शांतता रहावी, यासाठी ग्रामस्थांनी काही अचार संहिता तयार केली जाणार आहे. यात गावात येणाऱ्यांनी घोषणाबाजी करू नये, मद्यपिवून कोणीही गावात येवू नये, गोंधळ घालू नये आदी सूचना दिल्या जाणार आहेत. त्यासाठीचे सूचना फलक गावात लावून, सोशल मीडियावरही प्रसिद्ध केले जाणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या लढ्यातील आंदोलन सर्वांनी शांततेत करावे, असे आवाहनही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाTrupti Desaiतृप्ती देसाईJalanaजालना