शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

"... तेव्हा पाटील दादांकडे कुणीही आलं नाही", तृप्ती देसाईंचा जालन्यातून इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 22:06 IST

राज्यातील सर्वपक्षीय बड्या नेत्यांनी अंतरवालीत भेट दिल्यानंतर अद्यापही तेथे गर्दी कमी होताना दिसत नाही

जालना - अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाचा आज नववा दिवस असून, बुधवारी सकाळी ८ वाजता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणस्थळी असलेल्या डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावून उपचार केले. अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी प्रमाणपत्राबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. मात्र, अद्यापही अंतरवाली येथे नेतेमंडळी आणि संघटनाच्या पदाधिकाऱ्यांच्य भेटी सुरूच आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली. 

राज्यातील सर्वपक्षीय बड्या नेत्यांनी अंतरवालीत भेट दिल्यानंतर अद्यापही तेथे गर्दी कमी होताना दिसत नाही. याउलट मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा वाढत आहे. तृप्ती देसाई यांनीही येथे भेट देत सरकारला इशारा दिला. तसेच, भेटी देणाऱ्या नेत्यांवरही टीका केली. 

जेव्हा पाटील दादा उपोषणाला बसले तेव्हा कुणीच नाही आलं, जेव्हा राज्यभरात वातावरण पेटायला लागलं. जेव्हा मीडियात बातम्या यायला लागल्या तेव्हा सगळे नेते इकडं यायला लागले. इथल्या आजुबाजूच्या मतदारसंघातील नेतेही इकडे फिरकले नव्हते. पण, आता राज्यभर हा मुद्दा गाजतोय म्हटल्यावर, आपण तिथं जाऊन बसलं पाहिजे असं वाटल्यानेच ही नेतेमंडळी आली, असे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी म्हटलं.

हे आंदोलन म्हणजे गरिब माणसांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. सरकारने ताबडतोब जीआर काढावा, यांना जर काही झालं कमी जास्त, तर मी मंत्रालयात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही. मग, मला ९० दिवस तुरुंगात जावं लागलं तरी चालेल, असे म्हणत तृप्ती देसाई यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. 

मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षण संदर्भात निर्णय घेतला. आरक्षणासाठी आम्ही पाच न्यायाधीशांची समिती गठीत केली. ही समिती आरक्षणाबाबत पुराव्यांची पडताळणी करेल. निवृत्त न्यायाधिशांची ही समिती असेल. निजामकालीन नोंदींना कुणबी प्रमाणपत्र देणार आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.  

मनोज जरांगेची घोषणा

निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठा समाज बांधवांना तत्काळ कुणबी दाखले देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असा शासनाचा निरोप माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे यांनी बुधवारी रात्री उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना दिला. शासनाच्या निर्णयावर आपण सहकाऱ्यांसमवेत चर्चा करुन गुरूवारी सकाळी ११ वाजता आमरण उपोषणाबाबतचा आपला निर्णय जाहीर करू, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.

गावकऱ्यांनी ठरवली आचारसंहिता

समन्वय समिती प्रशासनाच्या संपर्कात आहे. गावात शांतता रहावी, यासाठी ग्रामस्थांनी काही अचार संहिता तयार केली जाणार आहे. यात गावात येणाऱ्यांनी घोषणाबाजी करू नये, मद्यपिवून कोणीही गावात येवू नये, गोंधळ घालू नये आदी सूचना दिल्या जाणार आहेत. त्यासाठीचे सूचना फलक गावात लावून, सोशल मीडियावरही प्रसिद्ध केले जाणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या लढ्यातील आंदोलन सर्वांनी शांततेत करावे, असे आवाहनही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाTrupti Desaiतृप्ती देसाईJalanaजालना