शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पाणी न सोडण्यासाठी जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:08 AM

मंठा, परतूर, सेलू या तिन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातून १५ मे पासून पाणी सोडण्यात येणार होते. परंतु हे पाणी सोडू नये म्हणून शुक्रवारी चार युवकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : मंठा, परतूर, सेलू या तिन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या निम्न दुधना प्रकल्पातून १५ मे पासून पाणी सोडण्यात येणार होते. परंतु हे पाणी सोडू नये म्हणून शुक्रवारी चार युवकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.निम्न दुधना प्रकल्पात सध्या मृत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातून जर नदीपात्रातून परभणी जिल्ह्यात पाणी सोडल्यास त्याचा मोठा अपव्यय होणार आहे. तो थांबविण्यासाठी हे जलसमाधीचे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.पाणी सोडू नये म्हणून मंठा - परतूर तालुका पुनर्वसन समिती तसेच जि. प. सदस्य पंजाब बोराडे यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी सोडल्यास जलसमाधी घेऊ, असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर ९ मे रोजी काँग्रेस- राष्ट्रवादीने आंदोलन छेडले होते.या पेटलेल्या पाणीप्रश्नावर शुक्रवारी प्रशासनाची भंबेरी उडाली. आंदोलनातील जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव बोराडे, राजेश मोरे, विष्णू कवळे, संतोष कवळे, राजेभाऊ खराबे हे जलसमाधी घेण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्यात उतरले असता एकच खळबळ उडाली होती.यावेळी सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भुजंग गोरे, सभापती संदीप गोरे, नगराध्यक्ष विनोद बोराडे, गणेश खवणे भारत बोराडे, नागेश घारे, नाथा काकडे, गुलाब लाटे यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.दरम्यान पालकमंत्री बबन लोणीकर यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.या प्रकरणी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी लक्ष घालून आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी तातडीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.आणि पाणी सोडण्याची अफवा असल्याचे सांगितल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :WaterपाणीriverनदीagitationआंदोलनDamधरण