शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

स्मशानभूमीच्या जागेसाठी बागवान समाजाचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 01:16 IST

बागवान समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. यामुळे संतप्त समाजबांधवानी उड्डाणपुलाचे काम बंद पाडून ठिय्या आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. तरीही शहागड येथील बागवान समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. यामुळे संतप्त समाजबांधवानी उड्डाणपुलाचे काम बंद पाडून ठिय्या आंदोलन केले.औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात बागवान समाजाची स्मशानभूमीची जागा संपादित केली आहे. स्मशानभूमीसाठी जागा देण्यात येईल असे संपादन करताना आश्वासन देण्यात आले होते. मात्र दोन वर्षाचा कालावधी उलटूनही यावर अद्यापही कुठलाच निर्णय झाला नाही. याबाबत महामार्गाचे काम करत असलेल्या संबंधित कंपनीचे पदाधिकारी, महसूलचे अधिकारी आणि समाजबांधवांत अनेक वेळा जागेविषयी बैठका झाल्या. मात्र तोडगा निघू शकला नाही. निव्वळ आश्वासन देण्यात येत असल्याचे समाजबांधवांचे म्हणणे आहे. परिसरात महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. स्मशानभूमीच्या जागेवर उड्डाणपूल होत आहे. संपादित केलेली जमिनीच्या मोबदल्यात तितकीच जागा परिसरात इतरत्र देण्यात यावी या मागणीसाठी बागवान समाजबांधवांनी उड्डाणपुलावर बुधवारी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. यामुळे दोन दिवसांपासून उड्डाणपुलाचे काम ठप्प आहे.बागवान समाजाच्या मागणीसाठी जानेवारीत महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बागवान समाज बांधव व आयआरबी कंपनीचे पदाधिकारी, तसेच महसूलच्या अधिकाºयांची बैठक होऊन वाळेकेश्वर परिसरातील गट क्रमांक ९ मधील जीवन प्राधिकरणाची जागा निश्चित करण्यात आली आहे. जागेवरुन सुरु झालेल्या राजकीय श्रेयामुळे जागा मिळेल की नाही. या बाबत समाजबांधवात साशंकता असल्याने बागवान समाजबांधवानी यावर तातडीने निर्णय घेऊन स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली. यावेळी अध्यक्ष अबू हुरेरा, अर्शद चौधरी, पं.स.निसार बागवान, यावेळी तलाठी कृष्णा मुजगूले, आयआरबी कंपनीचे धनराज परित, पाठक, प्रदीप कांबळे, सुरेंद्र सावळकर, चिनप्पा आदी अधिकारी उपस्थित होते.तहसीलदारांना निवेदनदरम्यान वाळकेश्वर येथील दलित व वडार समाजाच्या ग्रामस्थांनी तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांना घेराव घालत गट.न. ९ मधील जीवन प्राधिकरणाची जमीन स्मशानभूमीसाठी देण्याकरिता विरोध केला.तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांनी महसूलच्या पथकासह जिवण प्राधिकरणाच्या जागेची पाहणी केली, यावेळी बागवान समाजाच्या अनेक ग्रामस्थांनी तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांना निवेदन दिले व जोपर्यंत स्मशानभूमीसाठी दुसºया जागेचे मोजमाप करुन देत नाहीत, तोपर्यंत जुन्या स्मशानभूमीतील उड्डाणपुलाचे काम चालू देणार नाही असा पवित्रा घेतला.

टॅग्स :Socialसामाजिकagitationआंदोलनcommunityसमाज