शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

स्मशानभूमीच्या जागेसाठी बागवान समाजाचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 01:16 IST

बागवान समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. यामुळे संतप्त समाजबांधवानी उड्डाणपुलाचे काम बंद पाडून ठिय्या आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. तरीही शहागड येथील बागवान समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. यामुळे संतप्त समाजबांधवानी उड्डाणपुलाचे काम बंद पाडून ठिय्या आंदोलन केले.औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात बागवान समाजाची स्मशानभूमीची जागा संपादित केली आहे. स्मशानभूमीसाठी जागा देण्यात येईल असे संपादन करताना आश्वासन देण्यात आले होते. मात्र दोन वर्षाचा कालावधी उलटूनही यावर अद्यापही कुठलाच निर्णय झाला नाही. याबाबत महामार्गाचे काम करत असलेल्या संबंधित कंपनीचे पदाधिकारी, महसूलचे अधिकारी आणि समाजबांधवांत अनेक वेळा जागेविषयी बैठका झाल्या. मात्र तोडगा निघू शकला नाही. निव्वळ आश्वासन देण्यात येत असल्याचे समाजबांधवांचे म्हणणे आहे. परिसरात महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. स्मशानभूमीच्या जागेवर उड्डाणपूल होत आहे. संपादित केलेली जमिनीच्या मोबदल्यात तितकीच जागा परिसरात इतरत्र देण्यात यावी या मागणीसाठी बागवान समाजबांधवांनी उड्डाणपुलावर बुधवारी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. यामुळे दोन दिवसांपासून उड्डाणपुलाचे काम ठप्प आहे.बागवान समाजाच्या मागणीसाठी जानेवारीत महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बागवान समाज बांधव व आयआरबी कंपनीचे पदाधिकारी, तसेच महसूलच्या अधिकाºयांची बैठक होऊन वाळेकेश्वर परिसरातील गट क्रमांक ९ मधील जीवन प्राधिकरणाची जागा निश्चित करण्यात आली आहे. जागेवरुन सुरु झालेल्या राजकीय श्रेयामुळे जागा मिळेल की नाही. या बाबत समाजबांधवात साशंकता असल्याने बागवान समाजबांधवानी यावर तातडीने निर्णय घेऊन स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली. यावेळी अध्यक्ष अबू हुरेरा, अर्शद चौधरी, पं.स.निसार बागवान, यावेळी तलाठी कृष्णा मुजगूले, आयआरबी कंपनीचे धनराज परित, पाठक, प्रदीप कांबळे, सुरेंद्र सावळकर, चिनप्पा आदी अधिकारी उपस्थित होते.तहसीलदारांना निवेदनदरम्यान वाळकेश्वर येथील दलित व वडार समाजाच्या ग्रामस्थांनी तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांना घेराव घालत गट.न. ९ मधील जीवन प्राधिकरणाची जमीन स्मशानभूमीसाठी देण्याकरिता विरोध केला.तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांनी महसूलच्या पथकासह जिवण प्राधिकरणाच्या जागेची पाहणी केली, यावेळी बागवान समाजाच्या अनेक ग्रामस्थांनी तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांना निवेदन दिले व जोपर्यंत स्मशानभूमीसाठी दुसºया जागेचे मोजमाप करुन देत नाहीत, तोपर्यंत जुन्या स्मशानभूमीतील उड्डाणपुलाचे काम चालू देणार नाही असा पवित्रा घेतला.

टॅग्स :Socialसामाजिकagitationआंदोलनcommunityसमाज