शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

अवकाळी बरसला; अनेक गावांच्या शिवारात गारपीट, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:11 AM

जालना शहरासह अंबड, घनसावंगी, बदनापूर, जाफराबाद व परिसरातील अनेक गावांमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरासह अंबड, घनसावंगी, बदनापूर, जाफराबाद व परिसरातील अनेक गावांमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जालना तालुक्यातील कडवंची, अंबड तालुक्यातील शहागड, बदनापूर तालुक्यातील उज्जेनपुरी परिसरात गारपीठ झाल्याने रबी पिकांसह फळबागांना मोठा फटका बसला आहे.जालना शहरासह जिल्हाभरात गत काही दिवसांपूर्वीही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसात काढून ठेवलेली पिके भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच उभे असलेल्या पिकांचेही वादळी वारे, पावसामुळे नुकसान झाले होते. काही गाव व परिसरातील पिकांच्या नुकसानीची प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली होती. मात्र, भरपाई मिळेल की नाही ? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.या घटनेला काही दिवस लोटतात न लोटतात तोच मंगळवारी सायंकाळीही वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात हजेरी लावली.जालना तालुक्यातील कडवंची, नंदापूर, वडगाव व परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या गारपिटीत द्राक्ष बागांसह रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सरपंच चंद्रकांत पाटील, नंदापूर येथील नंदकुमार चव्हाण यांनी सांगितले.जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी, देळेगव्हाण परिसरातही गारपीट झाली. वादळी वा-यामुळे देळेगव्हाण परिसरातील झाडे उन्मळून पडल्याचे शेतकरी समाधान बनकर यांनी सांगितले. तर शेतातील शेडनेटचे जवळपास आठ लाखाचे नुकसान झाल्याचे कृष्णा सांगळे यांनी सांगितले.बदनापूर तालुक्यातील सोमठाणा, उज्जैनपुरी, भराडखेडा, कंडारी, अकोला, निकळक, वाल्हा, शेलगावसह परिसरालाही पावसाचा फटका बसला. गारपिटीमुळे गव्हासह काढणीआलेल्या पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. रात्री उशिरापर्यंत शहरासह तालुक्याच्या विविध भागात परिसरातीही वादळी वा-यांसह विजा चमकून पावसाच्या सरी बरसत होत्या.दरम्यान, वादळी वा-यामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीज गुल झाली होती. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.नुकसानभरपाई देण्याची मागणीजालना जिल्ह्यात गत काही दिवसांपूर्वीही अवकाळी पाऊस झाला होता. या पावसात रबी हंगामातील पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर मंगळवारी रात्री जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण भागात पुन्हा वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला.या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारीसह द्राक्षबागा, आंबा व इतर फळपिकांना मोठा फटका बसला आहे. झाडे उन्मळून पडल्यानेही नुकसानीचा सामना शेतक-यांना करावा लागला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन्ही वेळेस झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी