शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

कठीण काळात शेतकऱ्यांना अडचणी येऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:27 IST

जालना : कोरोनामुळे शेतातील भाजीपाला, फळांची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. त्यानुसार केलेल्या आवाहनानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतमालाची खरेदी-विक्री प्रक्रिया सुरू ...

जालना : कोरोनामुळे शेतातील भाजीपाला, फळांची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. त्यानुसार केलेल्या आवाहनानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतमालाची खरेदी-विक्री प्रक्रिया सुरू ठेवली. त्यामुळे कठीण काळातही शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले. तुरीसह आता हरभऱ्याला चांगला दर मिळत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट फोफावत असून, पुन्हा कठीण स्थिती निर्माण झाली, तरी शेतकऱ्यांना अडणीत येऊ देणार नाही, असे आवाहन माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सभापती खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती भास्कर दानवे, संचालक श्रीकांत घुले, अनिल सोनी, वसंत जगताप, भाऊसाहेब घुगे, सुभाष बोडखे, बाबासाहेब खरात, कमलाकर कळकुंबे, रमेश तोतला, गोपाल काबलिये, मधुकर मोठे, विष्णू चंद, कैलास काजळकर, तुळशीराम काळे, प्रल्हाद मोरे, अक्षय पवार, पंडित भुतेकर, अभिमन्यू खोतकर, जयप्रकाश चव्हाण, पांडुरंग डोंगरे आदींची उपस्थिती होती.

सध्या कोरोनाचा संसर्ग गुणाकार पद्धतीने वाढत आहे. ग्रामीण पातळीवरील कोरोनाचे प्रमाण अधिक आहे. अशा स्थितीत लस आली असली, तरीही विषाणूचे स्वरूप बदलल्याने प्रत्येकाने काळजी घ्यावी. आगामी काळात लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवल्यास बाजार समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाहीही खोतकर यांनी दिली. प्रास्ताविक संचालक भाऊसाहेब घुगे यांनी केले. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना उपस्थतांनी मान्यता दिली. सूत्रसंचालन भाऊसाहेब घुगे यांनी केले, तर संचालक वसंत जगताप यांनी आभार मानले. यावेळी अनिल खंडाळे, मोहन राठोड, संजय छबीलवाड, प्रफुल्ल हिवरेकर, कैलास चव्हाण, तनपुरे यांच्यासह व्यापारी, हमाल, मापाडी, सभासद शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.

चौकट...

शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताच्या योजना आखत मागील दहा वर्षांपासून अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची सुरू असलेली वाटचाल यामुळे मराठवाड्यात नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा नावलौकिक झाल्याचे उपसभापती भास्कर दानवे यांनी सांगितले. लॉकडाऊच्या काळात खोतकर यांनी वैयक्तिकरित्या लक्ष दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही. अडचणी उद्भवल्यास व्यापारी व हमाल यांच्या समन्वयातून तोडगा काढत खोतकर यांनी सुरळीतपणे बाजार समितीचा कारभार चालवल्याचेही दानवे म्हणाले.