शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगावराजा येथे रेल्वेच्या सर्वेक्षण पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST

देऊळगावराजा : जालना- खामगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी रेल्वे विभागाचे उपमुख्य परिचलन प्रबंधक तथा सर्वेक्षक सुरेशचंद्र जैन व त्यांच्या ...

देऊळगावराजा : जालना- खामगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी रेल्वे विभागाचे उपमुख्य परिचलन प्रबंधक तथा सर्वेक्षक सुरेशचंद्र जैन व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी देऊळगावराजा शहराला भेट दिली. नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांसह व्यापारी, शेतकऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली. यावेळी केलेल्या चर्चेत या पथकाने सकारात्मक भूमिका मांडल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

जैन व त्यांच्या पथकातील सहकाऱ्यांनी शुक्रवारी नगरपालिका सभागृहात पदाधिकारी, अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच श्री बालाजी महाराज यांच्या भरणाऱ्या यात्रेची माहिती घेतली. शिवाय कापूस उत्पादक शेतकरी, त्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांची मते जाणून घेतली. तालुक्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीकडून या ठिकणी घेण्यात येणाऱ्या उत्पादनाची माहिती घेण्यात आली. शिवाय खडकपूर्णा प्रकल्पामुळे या परिसरात बागायती क्षेत्रात वाढल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनीही हा रेल्वे मार्ग का आवश्यक आहे? हे उदाहरणांसह पटवून दिले. उपस्थित अनेक मान्यवरांनीही या रेल्वे मार्गाबाबत सकारात्मक भूमिका मांडत त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. यावेळी माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सुनीता शिंदे, डॉ. रामदास शिंदे, रमेश कायंदे, सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे पदाधिकारी, तहसीलदार सारिका भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक जगदाळे, सचिव किशोर म्हस्के यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

सकारात्मक अहवाल देणार

देऊळगाव राजा येथील पदाधिकारी, अधिकारी, व्यापारी, शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर जैन यांनी आपण सकारात्मक अहवाल रेल्वे विभागाला देणार असल्याचे सांगितले. तसेच देऊळगावराजा येथील नागरिकांमध्ये रेल्वे मार्गासाठी असलेला उत्साह हा वाखाणण्याजोगा असल्याचेही त्यांनी सांगितले. श्री बालाजी महाराजांची नगरी असल्याने या ठिकाणाहून हा मार्ग गेल्यास आपल्याला आनंद होईल, असेही जैन यांनी यावेळी सांगितले.

शेकडो वर्षांपासून पाठपुरावा

इंग्रजांच्या काळात जालना ते खामगाव या रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण करून ठिकठिकाणी मार्किंग करण्यात आले. मात्र, उत्पन्नाच्या कारणावरून हे काम रखडले होते. त्यानंतर खा. प्रतापराव जाधव यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. २०१६ मध्ये भाजप शासनाने पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत तीन हजार कोटी रुपयांना तत्त्वत: मान्यता दिली होती. यातील काही रक्कम राज्य शासन, तर काही रक्कम खाजगी विकासक देतील, असे ठरले होते; परंतु ही फाइल लालफितीत अडकली. या रेल्वेमार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. त्यामुळे या समितीने सकारात्मक अहवाल दिला तर हा विकासाचा मार्गही मोकळा होणार आहे.