शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना टेस्टकडे दुर्लक्ष, अनलॉक आणि बेफिकरी ठरतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:56 IST

गेल्या वर्षी म्हणजे साधारपणे २२ मार्चला लॉकडाऊन सुरू झाले. या घटनेच्या वर्षपूर्तीला उणापुरा एक महिना राहिला आहे. असे असतांनाच ...

गेल्या वर्षी म्हणजे साधारपणे २२ मार्चला लॉकडाऊन सुरू झाले. या घटनेच्या वर्षपूर्तीला उणापुरा एक महिना राहिला आहे. असे असतांनाच पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण छुप्या पध्दतीने वाढत आहेत. ही रुग्ण संख्या वाढण्यामागे कमी झालेल्या कोरोनाच्या टेस्ट हे देखील एक प्रमुख कारण असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, सर्दी, तापाची लक्षणे दिसूनही अनेकजण त्यावर वरवरचे उपचार करून स्वत:ला दिलासा देण्याचे काम करीत आहेत. परंतु त्यांना कोरोना झाला की, नाही याची वैद्यकीय चाचणी करून घेण्यास आज अनेक अशिक्षितांप्रमाणे सुशिक्षितही घाबरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्यावर्षी एप्रिल, मे महिन्यात ज्या प्रमाणे प्रभागनिहाय कंपल्सरी टेस्ट केल्या होत्या. तशाच पध्दतीने या टेस्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे. शंभरातील जवळपास ३० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे टेस्टनंतर पुढे येऊ शकते असे जाणकारांनी सांगितले.

चौकट

अनलॉकचा परिणाम

कोरोनाने आर्थिक चक्र उलटे फिरले होते. यामुळे अनेक उद्योग, रोजगार बंद होऊन सर्वात जास्त नुकसान आणि अडचण ही गोरगरीबांचीच झाली होती. ही बाब लक्षात घेऊन नंतर हळूहळू सर्व काही अनलॉक अर्थात सर्व व्यवहार, व्यवसाय आणि उद्योग सुरू करण्यात आले. त्याामुळे पोटाच्या भाकरीचा आणि हक्काच्या रोजगाराचा प्रश्न निकाली निघाला होता. परंतु या काळात अनेकांनी मास्कचा वापर टाळण्यासह स्वच्छतेकडे केलेले दुर्लक्ष पुन्हा भोवणार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.

चाैकट

जमावबंदीचे प्रशासनासमोर आव्हान

कोरोना काळात जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख या नात्याने बुधवारपासून जमाव बंदी लागू केली आहे. परंतु या जमाव बंदीच्या अंमलबजावणीचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. आज बाजारातील गर्दी ही प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरत आहे.