शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत असलेला संभ्रम दूर करावा- मेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:23 IST

आ. मेटे शनिवारी दुपारी जालना येथे आले होते. शहरातील हॉटेल शिवनेरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. ...

आ. मेटे शनिवारी दुपारी जालना येथे आले होते. शहरातील हॉटेल शिवनेरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. मेटे म्हणाले की, २५ जानेवारीपासून एसईबीसी आरक्षणावर सुनावणी होणार आहे. ती किती दिवस चालेल हे माहीत नाही. असे असतानाही राज्य सरकारने कधी नव्हे, तेवढी नोकरभरती करण्याची घाई सुरू केली आहे. नोकर भरतीमध्ये मराठा समाजाच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा पर्याय आहे. या आरक्षणाचा मराठा समाजातील मुला-मुलींनी लाभ घ्यावा. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न केला. परंतु, हे सरकार निर्णयच घेत नव्हते. उच्च न्यायालयाने सरकारला फटकारल्यानंतर आता कुठे सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत निर्णय घेतला आहे. यावर काही लोकांनी शंका उपस्थित केली आहे. हे आरक्षण घेतल्यावर काही परिणाम होऊ शकतो. परंतु, असे अजिबात नाही. मराठा समाजाला एसईबीसीचे आरक्षण मिळाले तर ईडब्ल्यूएसचे आरक्षण बंद होणार आहे. सरकारने २३ डिसेंबर रोजी काढलेल्या जीआरमध्ये सुधारणा करून लोकांमध्ये असलेली शंका दूर करावी, असेही ते म्हणाले. तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत ओबीसी मंत्र्यांकडून व संघटनांकडून होणारे आरोप हे बालिशपणाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

आघाडी सरकारने मराठा समाजाचा खेळखंडोबा लावला

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचा खेळ खंडोबा लावला आहे. अशोक चव्हाण यांच्याकडे हे सदर प्रकरण आल्यानंतर मराठा समाजाबद्दल एकही पॉझिटिव्ह गोष्ट झालेली नाही. राज्य सरकार व अशोक चव्हाण हे आरक्षणाबद्दल काळजी घेत नाहीत. त्यामुळे मराठा समाजावर ही वेळ आली असल्याचा आरोपही आ.मेटे यांनी केला.