शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही- संपतकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:21 AM

सर्वसामान्यांमध्ये सरकारच्या धोरणाविरूध्द प्रचंड नाराजी आहे. असे प्रतिपादन काँगे्रस समितीचे सचिव तथा राज्याचे सह प्रभारी संपतकुमार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना केंद्र आणि राज्यातील सरकार पाहिजे तेवढे गांभीर्याने घेत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये सरकारच्या धोरणाविरूध्द प्रचंड नाराजी आहे. असे प्रतिपादन काँगे्रस समितीचे सचिव तथा राज्याचे सह प्रभारी संपतकुमार यांनी केले.जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने संत गाडगेमहाराज पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पक्ष पातळीवरील नियोजनाचाही आढवा संपतकुमार यांनी घेतला. आगामी काळ हा निवडणुकांचा असल्याने सरकार वाटेल त्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करणार आहे. मात्र हे थांबवून वास्तव सामान्यांच्या लक्षात आणून देण्याचे काम काँग्रेसच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी करावे असे आवाहन त्यांनी केला. प्रारंभी संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आ. सुरेशकुमार जेथलिया हे होते. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, बुथ कमिटीचे मराठवाडा समन्वयक माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, धोंडीराम राठोड, नारायण मुंडे, अ. भा. सदस्य भीमराव डोंगरे, कल्याण दळे व विजय कामड , ज्ञानेश्वर भांदरगे, राजाभाऊ देशमुख, सत्संग मुंडे, ज्ञानदेव बांगर, अ‍ॅड. विनायक चिटणीस, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, इक्बाल कुरेशी, अ‍ॅड.संजय खडके, वैभव उगले, जीवन सले, विनोद यादव आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष शेख महेमूद यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र राख यांनी केले तर आभार राम सावंत यांनी मानले.

टॅग्स :droughtदुष्काळcongressकाँग्रेस