शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST

जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव, हातची गेलेली नोकरी यासह इतर अनेक कारणांनी अनेकांच्या मनावरील ताण वाढत आहे. या ताणतणावात कुटुंबातील ...

जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव, हातची गेलेली नोकरी यासह इतर अनेक कारणांनी अनेकांच्या मनावरील ताण वाढत आहे. या ताणतणावात कुटुंबातील सदस्य, मित्रांसमवेत असलेली संवादाची दरी वाढली तर आपल्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. अशाच संवादाच्या दरीतून मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

कोरोनामुळे अनेक कंपन्या बंद झाल्या. अनेक कंपन्यांनी मनुष्यबळामध्ये कपात केली. या कपातीच्या कात्रीत सापडलेल्या अनेक युवकांमध्ये नैराश्य आलेले आहे. अनेकांना काम मिळाले तर अनेकांच्या हाताला अद्याप काम नाही. अनेकजण शेतात कामाला जात आहेत. कोरोनामुळे बदललेल्या जीवन शैलीत अनेकांचा मानसिक तणाव वाढला आहे. या ताणतणावात कुटुंबातील सदस्य असोत किंवा मित्र असोत यांच्यामधील संवादाची दरी वाढू लागली आहे. संवाद कमी झाल्याने अनेकजण मानसिक आजाराने त्रस्त होत आहेत. शिवाय आत्महत्येसारखे विचारही अनेकांच्या मनात घर करण्याची भीती असते. त्यामुळे अशा घटना थांबविण्यासाठी एकमेकांमध्ये निर्माण झालेली संवादाची दरी दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मन हलके करणे हाच उपाय

मनातील नकारात्मक विचार दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा.

सकस आहार घेण्यासह नियमित व्यायाम करावा.

रात्रीच्या वेळी पुरेशी झोप घ्यावी

रागावर नियंत्रण ठेवावे

अडचणींवर मात करण्यासाठी इतरांशी चर्चा करावी

मानसोपचार तज्ज्ञ म्हणातात...

मागील काही दिवसांपासून मानसिक आजारांनी त्रस्त असल्याने उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मानसिक आजारातून रुग्णाला बाहेर काढण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनीच पुढाकार घेऊन वेळोवेळी योग्य संवाद साधणे गरजेचे आहे. एकमेकांशी सुयोग्य संवाद साधला तर मानसिक आजार दूर होण्यास मदत होते.

डॉ. नितीन पवार

मानसिक आजार जडण्याची विविध कारणे आहेत. अनेकजण छोट्या-छोट्या गोष्टींमुळे तणावात जातात. अशा व्यक्तींची मानसिकता ओळखून वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे. पती-पत्नी, पालक-मुलांमधील संवादही यात महत्त्वाचा आहे. समोरील व्यक्तीची मानसिकता ओळखून त्यांचे मन परिवर्तन करून मानसिक आजारातून बाहेर काढता येते. शिवाय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणेही महत्त्वाचे आहे.

डॉ. संदीप लहाने