शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात गल्हाटी-मांगणी नदीला पूर; तर दुसरीकडे दुधना नदीपात्रात जलसमाधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 13:33 IST

नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उध्वस्त झाला आहे.

जालना : जालना जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अनेक भागात नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. वडीगोद्री मंडळात दोन दिवसांच्या उघडीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शहापूर येथील गल्हाटी नदी आणि नालेवाडी येथील मांगणी नदीला पूर आला. यामुळे नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उध्वस्त झाला आहे.

गल्हाटी नदीला आलेल्या पुरामुळे जुने पिठोरी सिरसगावात १२ ते १५ घरांत पाणी शिरले. कपडे, धान्य व अन्य साहित्य भिजून नागरिकांचे नुकसान झाले. नालेवाडी येथील झोपडपट्टीतही पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उघडे पडले आहेत. मांगणी नदीला पूर आल्याने नालेवाडी परिसरातील रेणापुरी, चंदनापुरी, दह्याळा, भांबेरी, चौंधाळा, विहमांडवा यांचे रस्ते रविवारी रात्रीपासून बंद झाले आहेत.

दरम्यान, अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथेही गल्हाटी नदीला आलेल्या पुरामुळे गावातील दुकान व हॉटेलमध्ये पाणी शिरले. नागरिकांची धावपळ उडाल्याने जिल्हा परिषद शाळा व मत्स्योदरी विद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली. “पुराच्या पाण्यात कोणीही नदीपात्र किंवा पुलावरून जाऊ नये, सर्वांनी सतर्क राहावे,” असा इशारा सरपंच वंदना काळे यांनी दिला आहे.

या अस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर रांजणी परिसरातील शेतकरी सरकारविरोधात आक्रोश करत आहेत. अतिवृष्टी नुकसान अनुदानात रांजणीसह चार मंडळांचा समावेश न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी दुधना नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. विठ्ठल देशमुख, गौतम देशमुख, नानाभाऊ उगले, अमोल देशमुख, धनंजय देशमुख, सतीश महाराज जाधव, भगवान इंगळे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले. पीकहानी झाल्यानंतरही अनुदानापासून वंचित ठेवले गेल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे.

टॅग्स :RainपाऊसJalanaजालनाfloodपूर