शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हाच खरा ‘आत्मनिर्भर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST

सिंचनाच्या सुविधा वाढीसाठी प्रयत्नांची गरज विष्णू वाकडे जालना : उत्तम शेती, कनिष्ठ व्यापार अशी म्हण रूढ आहे. भारत हा ...

सिंचनाच्या सुविधा वाढीसाठी प्रयत्नांची गरज

विष्णू वाकडे

जालना : उत्तम शेती, कनिष्ठ व्यापार अशी म्हण रूढ आहे. भारत हा पूर्वीपासून एक कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतीमध्ये घाम गाळून शेतकरी केवळ स्वत:चेच पोट भरत नाही, तर तो जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो.

१ जुलै ही राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे वसंतराव नाईक यांची जयंती, याचदिवशी साजरी केली जाते. राज्यात आणि देशात आज शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत. परंतु, त्या प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. ही समस्या दूर झाल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळेल. जिल्ह्याचा विचार केल्यास, जालना जिल्हा हा बियाणांची पंढरी म्हणून ओळखला जातो. या बियाणांच्या पंढरीला खरी ओळख करून दिली, ती बद्रिनारायण बारवाले यांनी. बदलत्या काळाची गरज ओळखून त्यांनी बीटी बियाणांचा विकास करून कपाशीचे बीटी बियाणे देशात सर्वप्रथम आणले.

त्यामुळे आज कापूस उत्पादनात भारत जगात पहिल्या पाच देशांमध्ये गणला जातो. शेती आणि पाणी हे समीकरण आहे. ही गरज लक्षात घेऊन २५ वर्षांपूर्वी कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांनी कडवंची येथे जे पाणलोट क्षेत्र विकसित केले आहे, ते निश्चितच प्रेरणादायी आहे.

कृषी विज्ञान केंद्र, राज्याचा कृषी विभाग यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन मिळत आहे, त्यातून शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढून आर्थिक संपन्नता येण्यास मदत झाली आहे.

नवीन तंत्रज्ञानाची कास धरून शेती गरजेची

बदलत्या काळानुसार पारंपरिक पध्दतीने शेती करणे आता शक्य नाही. त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध आहे, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन उत्पादन वाढविण्याची गरज आहे. शेतीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आलेले आहेत. गरज आहे ती केवळ शेती कुठल्याही परिस्थितीत टिकवून ठेवून ती सांभाळण्याची.