शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी अनुदानाचे ९४ कोटी रूपये वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST

विजय मुंडे जालना : अतिवृष्टीने बाधित पिकांच्या नुकसान अनुदानाचे जिल्हा बँकांच्या शाखांमधून वाटप सुरू आहे. आजवर जिल्हा बँकेने ५६६ ...

विजय मुंडे

जालना : अतिवृष्टीने बाधित पिकांच्या नुकसान अनुदानाचे जिल्हा बँकांच्या शाखांमधून वाटप सुरू आहे. आजवर जिल्हा बँकेने ५६६ गावातील २ लाख १५ हजार १७३ शेतकऱ्यांना ९४ कोटी २० लाख रूपये अनुदानाचे वाटप केले आहे.

अतिवृष्टीमुळे यंदा शेतकऱ्यांच्या पिकांची माती झाली नव्हे नदीकाठी असलेल्या शेतजमिनीतील मातीच पाण्यासोबत वाहून गेली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीच्या पंचनाम्यानंतर शासनस्तरावरून मदतीची घोषणा करण्यात आली. शासनकडून प्राप्त अनुदानापैकी १३६ कोटी ९१ लाख ३५ हजार रूपयांचे अनुदान जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आले होते. बँकेने ८६३ गावातील ३ लाख ३८ हजार ५२५ शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग केले आहे. वर्ग केलेल्या अनुदानापैकी आजवर ५६६ गावातील २ लाख १५ हजार १७३ शेतकऱ्यांना ९४ कोटी २० लाख रूपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यात जालना तालुक्यातील १६ हजार ८५३ शेतकऱ्यांना ९ कोटी ६७ लाख ९७ हजार रूपये, बदनापूर तालुक्यातील १० हजार ४६१ शेतकऱ्यांना ५ कोटी ८ लाख २६ हजार रूपये, अंबड तालुक्यातील ४५ हजार २१० शेतकऱ्यांना २० कोटी ७२ लाख रूपये, घनसावंगी तालुक्यातील ५३ हजार ८२५ शेतकऱ्यांना २८ कोटी २७ लाख ४७ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. तर भोकरदन तालुक्यातील ३४ हजार ३३३ शेतकऱ्यांना ६ कोटी ५६ लाख ५१ हजार रूपये, जाफराबाद तालुक्यातील ९९८६ शेतकऱ्यांना २ कोटी ७९ लाख ७१ हजार रूपये, परतूर तालुक्यातील २१ हजार ५६५ शेतकऱ्यांना १० कोटी ७ लाख ६१ हजार रूपये तर मंठा तालुक्यातील २२ हजार ९४० शेतकऱ्यांना ११ कोटी सात हजार रूपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

५६६ गावातील लाभार्थ्यांना लाभ

शासनस्तरावरून जिल्ह्यातील ८६३ गावातील ३ लाख ३८ हजार ५२५ शेतकऱ्यांसाठी १३६ कोटी ९१ लाख ३५ हजार रूपये मंजूर झाले आहेत. पैकी ५६६ गावातील ९४ कोटी २० लाख २४ हजार रूपये वाटप करण्यात आले आहेत.

अपुरे कर्मचारी अन् तांत्रिक समस्या

जिल्हा बँकेतील अपुरे कर्मचारी आणि शाखास्तरावर येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनुदान वाटपाची गती रोडावली आहे. याचा त्रास ग्रामीण भागातील शेतकरी, ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या समस्या सोडविण्याची गरज आहे.

किसान सन्मानचे २० कोटी जमा

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे २० कोटी ७४ लाख रूपयेही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. याचा जिल्ह्यातील एक लाख ३ हजार ७११ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

लवकरच पूर्ण वाटप

शासनाकडून आलेले सर्वच अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. त्यातील ६८ टक्के रकमेचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित अनुदान पुढील आठवड्यापर्यंत वाटप होईल. शाखा स्तरावरील समस्याही लवकरच सोडविण्यात येतील.

आशुतोष देशमुख

कार्यकारी संचालक, जिल्हा बँक