शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

coronavirus : जालन्यात दोघांचा बळी; ३३ जणांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 9:25 PM

जालना जिल्ह्यात बाधितांची संख्या ५५४ वर गेली आहे.

जालना : जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधित दोन रूग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला. तर जिल्ह्यातील ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुळे आजवर १५ जणांचा बळी गेला असून, बाधितांची संख्या ५५४ वर गेली आहे.

जालना शहरातील मंठा चौफुली परिसरातील ८५ वर्षीय व्यक्तीस न्युमोनियाचा त्रास असल्याने २७ जून रोजी उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच शहरातीलच नरिमननगर येथील ५५ वर्षीय व्यक्तीच्या मेंदूत रक्तस्त्राव होत असल्याने व इतर त्रास असल्याने २८ जून रोजी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दोन्ही रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, उपचार सुरू असताना दोन्ही रूग्णांचा मंगळवारी सकाळीच मृत्यू झाला.

तर मंगळवारी एकूण ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या बाधित रूग्णांमध्ये विणकर मोहल्ला भागातील सात, हॉटेल अमित जवळील तीन, वसुंधरानगर परिसरातील तीन, संजोग नगर मधील दोन, मस्तगड येथील एक, भरत नगर येथील एक, व्यंकटेशनगर येथील एक, जेपीसी बँक कॉलनीतील एक, बरवार गल्लीतील एक, संभाजी नगरमधील एक, सतकरनगर मधील एक, अकेली मस्जिद जवळील एक, मिशन हॉस्पिटल रोडवरील एक, मंगळबाजार मधील एक, नरीमननगर मधील एक (मयत), खडकपुरा येथील एक, दानाबाजार येथील एक, पानशेंद्रा (ता.जालना) येथील एक, टेंभुर्णी (ता.जाफराबाद) येथील चार अशा एकूण ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

तर रूग्णालयातील यशस्वी उपचारानंतर मंगळवारी १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील ९, अंबड शहरातील चांगलेनगर मधील एक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीनमधील एक जवान, मंगळबाजार मधील दोन, संभाजीनगर मधील दोन अशा एकूण १५ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५५४ वर गेली असून, त्यातील १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ३५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना