शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

"सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वय आवश्यक, हा विषय लवकर संपवा"; चव्हाण, भुमरे, जरांगे यांच्यात दोन तास चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 01:14 IST

ही चर्चा साधारणपणे ८:१५ ते १०:१० वाजेपर्यंत चालली. चव्हाण आणि भुमरे हे एकाच गाडीत आल्याने ही नियोजित भेट असल्याचे बोलले जात आहे.

पवन पवार -

वडीगोद्री (जालना ) : अंतरवली सराटी येथे भाजप नेते खासदार अशोक चव्हाण आणि खासदार संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या तिघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असून हा विषय लवकर संपवा, अशी आमची भावना असल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. ही चर्चा साधारणपणे ८:१५ ते १०:१० वाजेपर्यंत चालली. चव्हाण आणि भुमरे हे एकाच गाडीत आल्याने ही नियोजित भेट असल्याचे बोलले जात आहे.

चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वीही मी जरांगे यांची भेट घेतली होती. जरांगे यांच्या सर्व मागण्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे. मधल्या काळात आचार संहिता असल्याने काही प्रश्न सुटले नाही. यामुळे मी पुन्हा आज जरांगे यांच्या भेटीला आलो आहे. यावेळी, गंभीर गुन्हे वगळता, इतर किरकोळ स्वरूपाचे आंदोलन काळातील गुन्हे मागे घेण्याची चर्चा झाली. हैदराबाद गॅझेट प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण, अशी देखील मागणी आहे, यावरही यावेळी चर्चा झाली.

फोनवर मंत्री शंभु राजे देसाई आणि जरांगे यांचे बोलणे झाले आहे. जेवढ्या लवकर हा विषय संपेल तेवढे चांगला आहे. शासन स्तरावर आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत. मराठा समाजाचे प्रश्न लवकर मार्गी लागले पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. आजची भेट कुठलीही राजकीय नव्हती. मी मुख्यमंत्र्यांना भेटून या सर्व मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करणार आहे. शासन आणि जरांगे यांच्यात मी समन्वयाची भूमिका पार पाडत आहे, असे चव्हाण म्हणाले.

दरम्यान, अशोक चव्हाण हे सरकार, समाज की माध्यम म्हणून आले? हा विषय महत्त्वाचा नसून त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरूच राहील. बाकी आमच्या मागण्याबाबत पाठपुरावा सुरूच राहणार असून, हैदराबाद गॅजेट आणि सरसकट गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.

सगे सोयरेची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करावी. आजची चर्चा सविस्तर झाली असून, त्यांच्या लक्षात आले आहे की, ओबीसींना धक्का लागणार नाही. मुलींचं मोफत शिक्षण सरकारने केलं, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही आमची लढाई बंद नाही, 288 आमदार पाडायचे की, लढवायचे हे सुरू आहे. आम्ही सरकारचे काम करत आहोत. शांतता राज्यात राहावी हे सरकारचं काम आहे, आणि हेच आम्ही करत आहोत. आम्ही शांतता रॅली काढत आहोत. आमच आरक्षण आम्हाला द्या, मला राजकारणात ढकलू नका. नाही दिलं तर, पुढचं सांगत नाही,  असेही जरांगे यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAshok Chavanअशोक चव्हाण