शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

"सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वय आवश्यक, हा विषय लवकर संपवा"; चव्हाण, भुमरे, जरांगे यांच्यात दोन तास चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 01:14 IST

ही चर्चा साधारणपणे ८:१५ ते १०:१० वाजेपर्यंत चालली. चव्हाण आणि भुमरे हे एकाच गाडीत आल्याने ही नियोजित भेट असल्याचे बोलले जात आहे.

पवन पवार -

वडीगोद्री (जालना ) : अंतरवली सराटी येथे भाजप नेते खासदार अशोक चव्हाण आणि खासदार संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या तिघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असून हा विषय लवकर संपवा, अशी आमची भावना असल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. ही चर्चा साधारणपणे ८:१५ ते १०:१० वाजेपर्यंत चालली. चव्हाण आणि भुमरे हे एकाच गाडीत आल्याने ही नियोजित भेट असल्याचे बोलले जात आहे.

चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वीही मी जरांगे यांची भेट घेतली होती. जरांगे यांच्या सर्व मागण्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे. मधल्या काळात आचार संहिता असल्याने काही प्रश्न सुटले नाही. यामुळे मी पुन्हा आज जरांगे यांच्या भेटीला आलो आहे. यावेळी, गंभीर गुन्हे वगळता, इतर किरकोळ स्वरूपाचे आंदोलन काळातील गुन्हे मागे घेण्याची चर्चा झाली. हैदराबाद गॅझेट प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण, अशी देखील मागणी आहे, यावरही यावेळी चर्चा झाली.

फोनवर मंत्री शंभु राजे देसाई आणि जरांगे यांचे बोलणे झाले आहे. जेवढ्या लवकर हा विषय संपेल तेवढे चांगला आहे. शासन स्तरावर आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत. मराठा समाजाचे प्रश्न लवकर मार्गी लागले पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. आजची भेट कुठलीही राजकीय नव्हती. मी मुख्यमंत्र्यांना भेटून या सर्व मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करणार आहे. शासन आणि जरांगे यांच्यात मी समन्वयाची भूमिका पार पाडत आहे, असे चव्हाण म्हणाले.

दरम्यान, अशोक चव्हाण हे सरकार, समाज की माध्यम म्हणून आले? हा विषय महत्त्वाचा नसून त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरूच राहील. बाकी आमच्या मागण्याबाबत पाठपुरावा सुरूच राहणार असून, हैदराबाद गॅजेट आणि सरसकट गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.

सगे सोयरेची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करावी. आजची चर्चा सविस्तर झाली असून, त्यांच्या लक्षात आले आहे की, ओबीसींना धक्का लागणार नाही. मुलींचं मोफत शिक्षण सरकारने केलं, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही आमची लढाई बंद नाही, 288 आमदार पाडायचे की, लढवायचे हे सुरू आहे. आम्ही सरकारचे काम करत आहोत. शांतता राज्यात राहावी हे सरकारचं काम आहे, आणि हेच आम्ही करत आहोत. आम्ही शांतता रॅली काढत आहोत. आमच आरक्षण आम्हाला द्या, मला राजकारणात ढकलू नका. नाही दिलं तर, पुढचं सांगत नाही,  असेही जरांगे यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAshok Chavanअशोक चव्हाण