शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

जिल्हा परिषद शाळांत ‘बालरक्षक’ समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 12:27 AM

अंबड तालुक्यातील शहागड व परिसरातील १४ शाळांमध्ये ‘बालरक्षकांची’ निवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : कुठलाही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने प्रत्येक शाळेत ‘बालरक्षकांची’ नियुक्ती करण्यात येते. त्याअनुषंगाने अंबड तालुक्यातील शहागड व परिसरातील १४ शाळांमध्ये ‘बालरक्षकांची’ निवड करण्यात आली. या उपक्रमातून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्याअनुषंगाने ‘बालरक्षक’ संकल्पना अस्तित्वात आली आहे. यामुळे कधीही शाळेत न गेलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे. शहागड केंद्रातील १४ प्राथमिक शाळांसह परिसरातील जिल्हा परिषद शाळांत ‘बालरक्षकांची’ नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शाळातील शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.या बालरक्षकांना शाळाबाह्य मुले आढळल्यास त्यांना जवळील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश दिला जाणार असून, इतर सुविधाही पुरविल्या जाणार असल्याचे केंद्रप्रमुख रंजित बांगर यांनी सांगितले.५६ मुले शिक्षणाच्या प्रवाहातशिक्षण विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत ५६ शाळाबाह्य मुले सापडले आहे. कामासाठी व ऊस तोडीसाठी केलेल्या या ५६ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना आपापल्या सोयीनुसार जवळील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला असून, त्यांना सुविधाही पुरविल्या जात आहेत. त्यामुळे अनेक मुले शिक्षणाकडे आकर्षित होत असल्याचे केंद्रप्रमुख रंजित बांगर यांनी सांगितले.‘बालरक्षक’ संकल्पनेमुळे शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण हमीपत्र दिले जाते. ज्यामुळे शाळाबाह्य मुलांनी काही कारणास्त्व इतरत्र शाळा बदलली तर हमीपत्रामुळे प्रवेश घेण्यास सुलभता येणार आहे.सोबतच सर्व कागदपत्रांची पूर्तता हमीपत्रात राहणार असल्याने विद्यार्थी कुठेही गेला तरी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे शिक्षण हमीपत्र योजनेची अंमलबजावणी होत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalna z pजालना जिल्हा परिषदSchoolशाळा