शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
6
aumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
7
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
8
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
9
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
10
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
11
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
12
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
13
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
14
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
15
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
16
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
17
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
18
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
19
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
20
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’

"...तर ते सरकार जागेवर राहत नाही", जालन्यातून देवेंद्र फडणवीसांचे सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 2:45 PM

पाणी प्रश्नावर औरंगाबादप्रमाणे जालन्यातही भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

जालना: पाणी प्रश्नावर काही दिवसांपूर्वी भाजपने औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चा काढला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या मोर्चाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर आता उद्योगनगरी असलेल्या जालना शहरातील पाणीप्रश्नासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रस्त्यावर उतरून जल आक्रोष मोर्चा काढला. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी सत्ताधारी सरकारवर सडकून टीका केली.

'आम्ही जालन्याला निधी दिला'"अडीच वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहात, 129 कोटी रुपयांचे काय केले? नाकर्तेपणामुळे पाणी देता येत नाही, तेच असे प्रश्न विचारात आहेत. पाणीप्रश्नावर भाजप काय उपाय करणार, सरकारकडे पैसे आहेत. रावसाहेब दानवे यांच्यामुळेच 129 कोटी रुपये जालन्याला मिळाले आहेत. आम्ही औरंगाबादेत आक्रोश मोर्चा काढल्यामुळेच सरकार जागे झाले आणि मुख्यमंत्री औरंगाबादेत आले."

'सरकारला जागं करण्यासाठी मोर्चा'"धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती जालन्यामध्ये आहे. पैठनच्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असताना जालन्यात मात्र 15-15 दिवस पाणी येत नाही. सरकारला जागं करण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढलाय, जे सरकार सामान्य माणसांची दखल घेत नाही, ते जागेवर राहत नाह," अशी टीकाही फडणवीसांनी केली.

दानवेंची टीकायावेळी रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनीदेखील सरकारवर टीका केली. "जालन्याला आम्ही निधी दिला. आता राज्यात त्यांचे सरकार आहे, या निधीचा हिशोब राज्य सरकारने दिला पाहिजे? आमचे उत्तरदायित्व आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना पैसे दिले. आमचे मते चोरीला गेले. आम्ही येणाऱ्या निवडणुकीत यांना शिक्षा देऊ, असा इशारा दानवे यांनी शिवसेनेला दिला.

सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी

जालना शहरातील मामा चौकात बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. शिवसेनेच्या धनुष्याला लागलीय राष्ट्रवादीची दोरी, काँग्रेसवाले हसतात... होते आपल्या पाण्याची चोरी..., दे रे नगर परिषद पाणी दे, घानेवाडी उशाला- कोरड घशाला.. असे फलक हाती घेवून, डोक्यावर घागरी, मडके घेवून महिलाही या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. हलगी- डोल- ताशांच्या गजरात भाजपाचा जयघोष करताना महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी केली जात होती. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चास प्रारंभ झाला. मामा चौक ते सराफा बाजार, काद्राबाद, सुभाष चौक, मंमादेवी चौक मार्गे हा मोर्चा गांधीचमन येथे गेला. गांधीचमन येथे जाहीर सभेत या मोर्चाचे रूपांतर झाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalanaजालनाBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी