शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांना न सांभाळणाऱ्या नोकरदार मुलास चपराक; दरमहा ५ हजार देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 17:26 IST

वडील म्हणतात मुलांच्या नावे जमीन करुन देण्याची चूक करू नका

- फकिरा देशमुखभोकरदन: आरोग्य खात्यात चांगल्या पगारावर नोकरीवर असतानाही वडिलांचे पालनपोषण न करणाऱ्या मुलास चांगलाच धडा मिळाला आहे. मुलाने दरमहा 5 हजार रुपये वडिलांना द्यावे असा असा महत्वपूर्ण निकाल उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिला. या निकालाने वडिलांची जबाबदारी झटकणाऱ्या मुलास चपराक ठरली आहे.

या बाबतची माहिती अशी की, तालुक्यातील हिसोडा येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी सरपंच कडूबा सयाजी जगताप यांना सुधाकर, भास्कर, राजू व कैलास अशी चार मुले आहेत. त्यापैकी भास्कर, राजू व कैलास ही तीन मुले शेती करतात. तर सुधाकर हा टाकरखेड ( तालुका  देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा ) येथे आरोग्य विभागात शासकीय नोकरी करत आहे. त्यास दरमहा 50 हजार रुपये इतके शासकीय वेतन आहे. कडूबा जगताप यांनी चारही मुलांचे उत्तमप्रकारे पालनपोषण करून वाढवले. त्यांचे थाटामाटात विवाह करून दिले. एवढेच नाही तर आपल्या नावावरील सर्व शेतजमीन त्यांच्या नावावर करून दिली. दरम्यान, सुधाकर याच्याकडे राहणाऱ्या कडूबा यांच्या पत्नीचे एक वर्षांपूर्वी निधन झाले. तर कडूबा जगताप हिसोडा येथे शेती करणाऱ्या मुलासोबत राहतात त्यांचे वय 82 वर्ष आहे. तसेच त्यांना पक्षाघात झालेला आहे. उपचारासाठी त्यांना 25 हजार रुपये आवश्यक आहेत. 

त्यामुळे त्यांनी नोकरीत असलेल्या सुधाकर जगताप याच्याकडून 10 हजार रुपये दरमहा व शेती करणाऱ्या तिन्ही मुलाकडून प्रत्येकी 5 हजार प्रमाणे 15 हजार रुपये मिळावे यासाठी आई वडील व जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 चे कलम 5 व 9 अन्वये उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. दरम्यान, उपविभागीय अधिकारी चोरमारे यांनी सुनावणी घेतली असता शेती करणारे तिन्ही मुले वडील कडूबा जगताप यांना शेतीच्या उत्पन्नातून 6 हजार रुपये देतात असे अर्जदाराने मान्य केले. मात्र, नोकरी असलेला मुलगा सुधाकर जगताप याने वडिलांच्या पालन पोषणाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत एक रुपयाही दिला नसल्याचे अर्जदार कडूबा जगताप यांनी उपविभागीय अधिकारी चोरमारे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर २५ एप्रिल रोजी चोरमारे यांनी सुधाकर जगताप याने वडिलांना 5 हजार रुपये खावटी द्यावी असा निर्णय दिला. 

वृद्धावस्थेत आधाराची गरजजन्मदात्या आई-वडिलांना वृद्धावस्थेत खऱ्या आधाराची गरज असते. अशावेळी मुलांकडून दुर्लक्ष केले जाते. 2022 मध्ये 11 व 2023 मध्ये आतापर्यंत 2 अशी 13 प्रकरणे माझ्याकडे दाखल करण्यात आली होती. ते प्रकरणे निकाली काढत जेष्ठ नागरिकांना न्याय देण्यात आला आहे. मुले सांभाळ करीत नसतील पालकांनी तत्काळ संपर्क करावा.- अतुल चोरमारे, उपविभागीय अधिकारी 

जमीन नावावर करू नका काबाडकष्ट करून मुलांना मोठे केले. जमीन त्यांच्या नावे करून दिली. ती चूक कोणी करू नये. तीन मुले सांभाळ करतात. मात्र ज्याला नोकरी लागेपर्यंत सांभाळले त्याने धोका दिला. आज न्याय मिळाला आहे. - कडूबा जगताप

टॅग्स :JalanaजालनाFamilyपरिवारCrime Newsगुन्हेगारी