शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

वडिलांना न सांभाळणाऱ्या नोकरदार मुलास चपराक; दरमहा ५ हजार देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 17:26 IST

वडील म्हणतात मुलांच्या नावे जमीन करुन देण्याची चूक करू नका

- फकिरा देशमुखभोकरदन: आरोग्य खात्यात चांगल्या पगारावर नोकरीवर असतानाही वडिलांचे पालनपोषण न करणाऱ्या मुलास चांगलाच धडा मिळाला आहे. मुलाने दरमहा 5 हजार रुपये वडिलांना द्यावे असा असा महत्वपूर्ण निकाल उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिला. या निकालाने वडिलांची जबाबदारी झटकणाऱ्या मुलास चपराक ठरली आहे.

या बाबतची माहिती अशी की, तालुक्यातील हिसोडा येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी सरपंच कडूबा सयाजी जगताप यांना सुधाकर, भास्कर, राजू व कैलास अशी चार मुले आहेत. त्यापैकी भास्कर, राजू व कैलास ही तीन मुले शेती करतात. तर सुधाकर हा टाकरखेड ( तालुका  देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा ) येथे आरोग्य विभागात शासकीय नोकरी करत आहे. त्यास दरमहा 50 हजार रुपये इतके शासकीय वेतन आहे. कडूबा जगताप यांनी चारही मुलांचे उत्तमप्रकारे पालनपोषण करून वाढवले. त्यांचे थाटामाटात विवाह करून दिले. एवढेच नाही तर आपल्या नावावरील सर्व शेतजमीन त्यांच्या नावावर करून दिली. दरम्यान, सुधाकर याच्याकडे राहणाऱ्या कडूबा यांच्या पत्नीचे एक वर्षांपूर्वी निधन झाले. तर कडूबा जगताप हिसोडा येथे शेती करणाऱ्या मुलासोबत राहतात त्यांचे वय 82 वर्ष आहे. तसेच त्यांना पक्षाघात झालेला आहे. उपचारासाठी त्यांना 25 हजार रुपये आवश्यक आहेत. 

त्यामुळे त्यांनी नोकरीत असलेल्या सुधाकर जगताप याच्याकडून 10 हजार रुपये दरमहा व शेती करणाऱ्या तिन्ही मुलाकडून प्रत्येकी 5 हजार प्रमाणे 15 हजार रुपये मिळावे यासाठी आई वडील व जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 चे कलम 5 व 9 अन्वये उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. दरम्यान, उपविभागीय अधिकारी चोरमारे यांनी सुनावणी घेतली असता शेती करणारे तिन्ही मुले वडील कडूबा जगताप यांना शेतीच्या उत्पन्नातून 6 हजार रुपये देतात असे अर्जदाराने मान्य केले. मात्र, नोकरी असलेला मुलगा सुधाकर जगताप याने वडिलांच्या पालन पोषणाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत एक रुपयाही दिला नसल्याचे अर्जदार कडूबा जगताप यांनी उपविभागीय अधिकारी चोरमारे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर २५ एप्रिल रोजी चोरमारे यांनी सुधाकर जगताप याने वडिलांना 5 हजार रुपये खावटी द्यावी असा निर्णय दिला. 

वृद्धावस्थेत आधाराची गरजजन्मदात्या आई-वडिलांना वृद्धावस्थेत खऱ्या आधाराची गरज असते. अशावेळी मुलांकडून दुर्लक्ष केले जाते. 2022 मध्ये 11 व 2023 मध्ये आतापर्यंत 2 अशी 13 प्रकरणे माझ्याकडे दाखल करण्यात आली होती. ते प्रकरणे निकाली काढत जेष्ठ नागरिकांना न्याय देण्यात आला आहे. मुले सांभाळ करीत नसतील पालकांनी तत्काळ संपर्क करावा.- अतुल चोरमारे, उपविभागीय अधिकारी 

जमीन नावावर करू नका काबाडकष्ट करून मुलांना मोठे केले. जमीन त्यांच्या नावे करून दिली. ती चूक कोणी करू नये. तीन मुले सांभाळ करतात. मात्र ज्याला नोकरी लागेपर्यंत सांभाळले त्याने धोका दिला. आज न्याय मिळाला आहे. - कडूबा जगताप

टॅग्स :JalanaजालनाFamilyपरिवारCrime Newsगुन्हेगारी