शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

२५७ कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST

जालना : आगामी २०२१-२२ वर्षाचा विकास आराखडा शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. या बैठकीत २५७ कोटी ...

जालना : आगामी २०२१-२२ वर्षाचा विकास आराखडा शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. या बैठकीत २५७ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांच्या प्रारूप विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जिल्ह्याच्या विकास आराखड्याच्या निधीत आणखी भरीव वाढ करून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, त्यात मोठ्या रकमेचे नियोजन करून घेऊ, असेही टोपे म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आ. बबनराव लोणीकर, आ. कैलास गोरंट्याल, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, आ. राजेश राठोड, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी वरील माहिती दिली.

.....

काेणत्या विभागाला किती निधी...

प्रारूप आराखड्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत १८१ कोटी १३ लाख रुपये.

जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत ७३ कोटी ९६ लाख आणि जिल्हा वार्षिक योजना (ओटीएसपी) अंतर्गत २ कोटी २५ लाख ९१ हजार रुपये अशा वित्तीय तरतुदीचा आराखडा मंजूर करण्यात आला.

यामध्ये कृषी व संलग्न सेवासाठी १६ कोटी ९५ लाख ३६ हजार, ग्रामीण विकासासाठी १० कोटी, विद्युत, ऊर्जा विकाससाठी ९ कोटी ६१ लक्ष ९० हजार, सामान्य आर्थिक विकासासाठी ५ कोटी २ लाख १६ हजार व सामाजिक व सामूहिक सेवा यासाठी ७२ कोटी ४२ लाख.

.....

निधी अखर्चित राहिल्यास कारवाई

कोविडच्या अनुषंगाने यावर्षी केवळ ३३ टक्केच निधी खर्च करण्यात आला. निधी खर्च करण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून यंत्रणांना वितरित करण्यात आलेला निधी संपूर्णपणे खर्च होईल, याची दक्षता घेण्यात येईल. प्राप्त निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करण्यात यावा. ज्या विभागाचा निधी अखर्चित राहील, त्यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी सांगितले.

.....

...तर संबंधित एजन्सीकडून रस्ते करून घ्या

नियोजन समितीच्या बैठकीत रस्त्यांसाठी १८ कोटी रुपये ठेवले आहेत. सध्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. समृद्धी महामार्ग, इतर मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू असल्याने वाळू, सिमेंट व इतर साहित्याची मोठी वाहने रस्त्यांवरून जातात. त्यामुळे रस्ते खराब होतात. ज्या एजन्सीच्या कामामुळे रस्ते खराब झाले, त्याच एजन्सीकडून रस्ते तयार करून घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

......

जालना पालिकेच्या पाणीपुरवठ्याचे वीजबिल शून्यावर येणार

जालना नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे वीजबिल शून्यावर आणण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एक मेगावॅटचा प्रकल्प मेढाच्या माध्यमातून उभारण्यात येईल. त्यासाठी साडेचार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. या प्रकल्पाची वीज महावितरणला दिली जाईल, जेणेकरून जालना नगरपालिकेला पाणीपुरवठ्याचे बिल शून्य येईल, असेही टोपे म्हणाले.