शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार लाभार्थी मोफत धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:26 IST

भोकरदन : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची मुदत संपल्यामुळे भोकरदन तालुक्यातील २ लाख ३० हजार लाभार्थींपैकी २० हजार गरीब लाभार्थी ...

भोकरदन : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची मुदत संपल्यामुळे भोकरदन तालुक्यातील २ लाख ३० हजार लाभार्थींपैकी २० हजार गरीब लाभार्थी मोफत धान्यापासून वंचित राहिले आहेत. धान्य वाटप न झाल्याने दुकानदार आणि लाभार्थींमध्ये शाब्दिक चकमकी होत आहेत.

केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना दोन किलो गहू, तीन किलो तांदूळ व एक किलो डाळ वाटप करण्यात येत होती. या योजनेची मुदत नोव्हेंबर २०२० होती. मात्र, तालुक्यातील २०८ स्वस्त धान्य दुकानदारांपैकी १४१ दुकानदारांना या योजनेंतर्गत मोफत योजनेचा उपलब्ध झालेला १० ते १२ हजार क्विंटल माल मिळाला. संबंधित दुकानदारांनी लाभार्थींना मालाचे वितरण केले. मात्र, ६७ दुकानदारांचा माल मुदतीच्या आत आला नाही. त्यामुळे त्यांनी लाभार्थींना वाटप केला गेला नाही. तालुक्यातील आलापूर, वालसा वडाळा, नळणी बु., तडेगाववाडी, तडेगाव, तळेगाव, बोरगाव तारू, वजीरखेड, मुठाड, वाडी बु., भोरखेड, कठोरा बाजार, सुरंगळी, टाकळी हिवरडी, सिरजगाव मंडप, चिंचोली, वाकडी, कोठा जहागीर, माळेगाव, भोकरदन, चोऱ्हाळा, लेहा, बरंजळा लोखंडे, देऊळगाव ताड, हसनाबाद, तळणी, आन्वा, मासनपूर, जळगाव सपकाळ, हिसोडा खु., हिसोडा बु., कोठा कोळी, पिंपळगाव रेणुकाई, सावंगी अवघडराव, रेलगाव, मोहळाई, वडशेद, पारध खु., पद्मावती, मानापूर, पाळसखेड पिपळे, केदारखेडा, चांदई एक्को, लोणगाव, निमगाव, दहीगाव, पोखरी, बोरगाव तारू, मेहेगाव, वाढोना, जयदेववाडी, गोकुळ या गावांतील तब्बल २० हजार लाभार्थींना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा गहू, तांदूळ व डाळ मिळाली नाही. मात्र, शेजारच्या गावांतील दुकानदाराने मोफत धान्य वाटप केले. मग आपल्या गावात का वाटप केले नाही ? अशी तक्रार लाभार्थी करीत आहेत. शिवाय काही ठिकाणी मोफत धान्य मिळत नसल्याने वादही निर्माण झाले आहेत.

माल आल्यानंतर वितरण

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात अर्धवट माल मिळाला होता. जेवढा माल मिळाला होता तो स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आला. त्यांनी ही तो लाभार्थींना वाटप केला. मात्र, त्यानंतर या योजनेची मुदत संपल्यामुळे जिल्ह्यात माल आलाच नाही. त्यामुळे ६७ दुकानदारांना मोफत योजनेचा माल देण्यात आला नाही. मात्र, मुदतवाढ मिळाल्यानंतर माल येईल व त्यानंतर या दुकानदारांना योजनेचा माल देण्यात येईल.

संतोष गोरड,

तहसीलदार, भोकरदन

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा माल जिल्ह्यातील अर्ध्या दुकानदारांना मिळाला. त्यांनी तो लाभार्थींना वाटप केला आहे. मात्र, ज्या दुकानदाराला मालच मिळाला नाही तरीसुद्धा त्याच्याकडे लाभार्थी मालाची मागणी करीत अहेत. शिवाय त्याला दोषी धरत आहेत. त्यांना लाभार्थींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत आहेत. या योजनेचा माल मिळण्यासाठी शासनाने मुदतवाढ देऊन गरजू नगरिकांना लाभ द्यावा.

जगन्नाथ थोटे

अध्यक्ष, जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना