पाकिस्तानला 'ही' चूक महागात पडणार; PoK भारतात विलीन करण्याचा मार्ग झाला मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:09 IST2025-06-05T16:08:47+5:302025-06-05T16:09:10+5:30
Shimla Agreement Deal: १९७२ च्या शिमला करारानुसार हा भाग पाकिस्तानला देण्यात आला होता.

पाकिस्तानला 'ही' चूक महागात पडणार; PoK भारतात विलीन करण्याचा मार्ग झाला मोकळा
Pakistan On Shimla Agreement Deal: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानावर जोरदार प्रहार केला. या कारवाईत पाकिस्तानासह पीओकेमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आले. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले सुरू केले. ४ दिवस चाललेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर झाला. पण, यादरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारत आणि पाकमधील १९७२ चा शिमला करार पूर्णपणे संपल्याची घोषणा केली होती.
२२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार थांबवला होता, त्यानंतर पाकिस्तानने शिमला करार स्थगित केला. यासोबतच पाकिस्तानी संरक्षण मंत्री म्हणाले होते की, भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती पूर्वीसारखीच झाली आहे. आता नियंत्रण रेषा (एलओसी) युद्धविराम रेषा मानली पाहिजे. तसेच, शिमला करार संपल्याचे घोषित करताना पाकिस्तानी संरक्षण मंत्री म्हणाले की, आता पाकिस्तान भारत-पाकिस्तान वाद द्विपक्षीय ऐवजी बहुपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गाने उपस्थित केला जाईल.
भारताकडे एक उत्तम संधी
दरम्यान, शिमला करार संपुष्टात आणण्याच्या घोषणेचा पाकिस्तानवरच सर्वात वाईट परिणाम होऊ शकतो. कारण, १९७१ च्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान पाकिस्तानने काश्मीरमधील चुंब शहर ताब्यात घेतले होते, जे स्वातंत्र्यापासून भारताचा भाग होते. १९७२ च्या शिमला करारानुसार या शहरावर पाकिस्तानचे नियंत्रण कायम ठेवण्यात आले.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चुंब महत्वाचे
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चुंब क्षेत्र खूप महत्वाचे आहे. १९४९ च्या युद्धविराम करारानुसार चुंबदेखील भारताचा एक भाग होता, परंतु १९६५ च्या युद्धादरम्यान पाकिस्तानने चुंबवर कब्जा केला. युद्धानंतर चुंब पुन्हा भारताच्या ताब्यात आले, परंतु १९७१ मध्ये पाकिस्तानने पुन्हा चुंबवर कब्जा केला. पुढे १९७२ च्या शिमला करारानुसार हे शहर पाकिस्तानचा भाग झाले. पुढे पाकिस्तानने चुंबचे नाव बदलून इफ्तिकाराबाद केले. पाकिस्तानने शहरावर कब्जा केल्यानंतर चुंबमध्ये राहणारी कुटुंबे भारतात स्थलांतरित झाली.
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा
आज चुंब हा पाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे, परंतु ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी १९७२ चा शिमला करार संपल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे भारतीय सैन्याकडे चुंब पुन्हा भारतात जोडण्याचा पर्याय आहे.