शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 13:49 IST

खरे तर, शनिवारपूर्वी ब्लॅकआउट उठवण्यात आले होते. मात्र पाकिस्तानच्या कृतींनंतर, पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा ब्लॅक आउट लागू करण्यात आले.

भारत आणि पाकिस्तान यांच्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर आणि तणावानंतर, शनिवार, १० मे रोजी युद्धविरामावर सहमती झाली. मात्र यानंतर, पाकिस्तानने अवघ्या ४ तासांतच सीमेवर गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरू केले. त्याला भारतानेही प्रत्युत्तर दिले. तत्पूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून दोन्ही देशांतील युद्धविरामाची घोषणा केली होती."अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या चर्चेनंतर, भारत आणि पाकिस्तान यांनी तत्काळ युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. या समजदारीबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन! असे ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून म्हटले होते. यानंतर भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनीही पत्रकार परिषदेत याची पुष्टी केली. मात्र, याच रात्री जम्मू आणि काश्मीरमध्ये ड्रोन दिसल्याचे आणि स्फोट झाल्याचे वृत्त आले. यानंतर, भारतीय लष्कराने हवाई संरक्षण प्रणालींचा वापर करून प्रत्युत्तर दिले आणि रात्री ११ वाजता विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाची माहिती दिली. तसेच भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराला चोख प्रत्युत्तर दिल्याचेही सांगितले.

पुन्हा ब्लॅक आउट -खरे तर, शनिवारपूर्वी ब्लॅकआउट उठवण्यात आले होते. मात्र पाकिस्तानच्या कृतींनंतर, पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा ब्लॅक आउट लागू करण्यात आले. पंजाबातील ज्या जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला, त्यांत  होशियारपूर, फिरोजपूर, फाजिल्का, पठाणकोट, पटियाला, मोगा, कपूरथला, मुक्तसर यांचा समावेश होता. गुजरातमधील कच्छ, जामनगर, पाटण, संतालपूर आणि बनासकांठा येथे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तर राजस्थानातील जोधपूर आणि जैसलमेर येथे वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले होते.

जम्मू आणि काश्मीरमध्ये तणाव आणि संघर्षशनिवारी संध्याकाळी नागरोटा लष्करी तळाजवळ एका संशयिताशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान जखमी झाला. व्हाईट नाईट कॉर्प्सने या चकमकीची पुष्टी केली आहे. ड्रोन हल्ले आणि स्फोटांमुळे खोऱ्यात तणाव कायम आहे.

पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा -या घडामोडींदरम्यान, आपण युद्धविरामाचे प्रामाणिकपणे पालन करण्यास वचनबद्ध आहेत, असे पाकिस्तानने म्हटले होते. याच वेळी पाकिस्तान ने भारतावरच युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आम्ही जबाबदारीने आणि संयमाने परिस्थिती हाताळत आहोत, भारतच काही भागात उल्लंघन करत आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवादOperation Sindoorऑपरेशन सिंदूर