शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भारतासोबतचा पंगा पाकिस्तानला महागात! चहा प्यायचेही वांदे; खिशाला जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 15:16 IST

पाकिस्तानात महागाईमुळे लोकांचं पुन्हा एकदा लोकांचं जगणं कठीण झाले आहे. चहा पिण्यासाठीही लोकांना करावा लागतोय विचार

ठळक मुद्देचहा पिण्यासाठीही लोकांना करावा लागतोय विचार

पाकिस्तानात महागाईमुळे लोकांचं पुन्हा एकदा लोकांचं जगणं कठीण झाले आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पाकिस्तानात गेल्या वर्षभरात महागाईदेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केवळ शहरांमध्येच नाही, तर गावखेड्यांमध्येही मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. दरम्यान, आता पाकिस्तानात लोकांना चहाची चवदेखील कडवट लागू लागली आहे. भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला महागात पडताना दिसत आहे. दरम्यान, पाकिस्तानला भारताकडून साखरे मिळणं शक्य होतं, परंतु त्यांनी भारताकडून साखर आयात करण्यास नकार दिला.

पाकिस्तानातील रावळपिंडी येथे लोकांना चहा पिताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. या ठिकाणी एक कप चहाची किंमत तब्बल ४० रूपये इतकी झाली आहे. एक कप चहाची किंमत यापूर्वी ३० रूपये होती. परंतु आता ती ४० रूपये झाली आहे. नुकतीच पुन्हा एकदा चहाच्या दरात वाढ करण्यात आली. चहा पावडर, दुध, साखर आणि गॅसच्या दरात झालेल्या वाढीमुळे गेल्या काही दिवसांमध्ये चहाच्या किंमतीत ३५ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती एका चहावाल्यानं पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनशी बोलताना दिली.

दुध १२० रूपये लीटरत्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानात दुधाचे दर १०५ रूपयांवरून वाढून १२० रूपये प्रति लीटर इतके झाले आहेत. याशिवाय चहा पावडरही ८०० ते ९०० रूपये आणि गॅस सिलिंडर १५०० ते ३ हजार रूपये झाले आहेत. महागाईमुळे कमाईवर मोठा परिणाम झाला आहे. परंतु चगाटे दर वाढवण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय आपल्याकडे नसल्याचं त्यांन सांगितलं. तर दुसरीकडे आणखी एका चहावाल्यानं आपली एका दिवसाची कमाई २६०० रूपये होती असं सांगितलं. परंतु संपूर्ण नफा पाहिला तर आपल्याला केवळ १५ रूपये फायदा होत होता. त्यामुळे जगणं अशक्य होतं. म्हणूनच चहाचे दर वाढवण्याचे प्रयत्न केल्याचं त्यानं सांगितलं.

म्हणून जनता संकटातपाकिस्तानी सरकारचे निर्णय पाकिस्तानच्या जनतेच्या अंगलट येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानद्वारे मागवण्यात आलेल्या साखरेची २८,७६० टनाची खेप पाकिस्तानात पोहोचली. या साखरेसाठी त्यांनी तब्बल ११० रूपये प्रति किलो दर मोजला. तर दुसरीकडे टीसीपीनं एक लाख टन साखर इम्पोर्ट केली होती. तेव्हा त्याचेदर जवळपास ९० रूपये प्रति किलो होते. भारतीय अधिकाऱ्यांनुसार पाकिस्तानला हवं असतं तर त्यांना कमी किंमतीतही साखरेचा पुरवठा होऊ शकला असता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत