शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला; 7 सैनिक मारले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 9:53 PM

Pakistan news: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घटनेच्या 10 तासांनी याचा ठपका भारतावर ठेवला आहे.

इस्लामाबाद : बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. बलुचिस्तान पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त व्हावा यासाठी तेथील नागरिकांनी हा हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या अत्याचाराला हे लोक वैतागले असून यामध्ये 7 सैनिक मारले गेले आहेत. यामागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. 

बलुचिस्तानमधील हरनाईमधील शारिंग पोस्टवर हा हल्ला झाला आहे. यामध्ये सात सैनिक मारले गेले आहेत. यामुळे या हल्ल्याचा बदला घेण्य़ासाठी पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण भागात पुन्हा अत्याचार सुरु केले आहेत. पाकिस्तानी सैन्य सामान्य माणसांच्या घरात घुसून त्यांच्यासोबत अभद्र वागते. त्यांना विरोध केल्यात दहशतवाद्याचा ठपका ठेवून गोळी झाडून मारले जाते. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घटनेच्या 10 तासांनी याचा ठपका भारतावर ठेवला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, रात्री उशिरा सैन्याच्या पोस्टवर झालेल्या हल्ल्यात ७ सैनिक शहीद झाले, हे ऐकून दु:ख झाले. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबाप्रती आहेत. आमचा देश साहसी सैनिकांसोबत उभा आहे, जे भारत समर्थित दहशतवाद्यांचा सामना करतात. 

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर सतत हल्ले होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच पंजपूर जिल्ह्यात सैन्याच्या एका ताफ्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये पाकिस्तानी कर्नलसह ८ जण जखमी झाले होते. पाकिस्तानी सैन्यावर मे नंतरचा हा तिसरा हल्ला होता. बलुचिस्तानी नागरिक आता कराचीसह अन्य भागातही पाकिस्तानी लष्करावर हल्ले करू लागले आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान