शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

सौदी अरेबियाचा पाकिस्तानला मोठा झटका; जाहीरपणे भारताच्या भूमिकेचं केले समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 7:05 PM

पाकिस्तान आतापर्यंत काश्मीर मुद्द्यांवर संयुक्त राष्ट्र संघात आवाज उचलत होता. परंतु भारत सुरुवातीपासून हा विषय द्विपक्षीय असल्याचं सांगत होता.

रियाद - सौदी अरेबियानं काश्मीरच्या मुद्द्यांवरून पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय विषय आहे. इतकेच नाही तर हा विषय भारत आणि पाकिस्तानला चर्चेतून सोडवावा लागेल असं क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान अल सऊद यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ रियाज दौऱ्यावर आलेले असताना सौदी अरेबियाच्या प्रिंसनं ही भूमिका स्पष्ट केली आहे.

पाकिस्तान आतापर्यंत काश्मीर मुद्द्यांवर संयुक्त राष्ट्र संघात आवाज उचलत होता. परंतु भारत सुरुवातीपासून हा विषय द्विपक्षीय असल्याचं सांगत होता. दहशतवादाबाबत भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागील काही वर्षापासून राजकीय संबंध दुरावले आहेत. यातच सौदी अरेबियानं शांतता आणि स्थिरतेसाठी दोन्ही देशांनी बहुचर्चित विशेषत: जम्मू काश्मीर वादावर चर्चेतून तोडगा काढण्यावर भर दिला. क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमा आणि शहबाज शरीफ यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सौदी अरेबियानं त्यांची भूमिका सांगितली. 

याआधी सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री यांनी भारतातील जम्मू काश्मीरमधील मुस्लीम लोकसंख्येचं समर्थन करत या भागातील सुरक्षा आणि स्थिरता मोठं आव्हान असल्याचं म्हटलं होते. जर हा मुद्दा सोडवला गेला नाही तर संपूर्ण भागात अस्थिरता पसरेल. इस्लामची ओळख आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी सौदी अरेबिया जम्मू काश्मीरातील मुस्लीमांचे समर्थन करते असं त्यांनी म्हटलं होते. सौदी अरेबियाच्या या विधानामुळे अनेक चर्चा झाल्या. सौदी अरेबियानं भारताचा विश्वासघात केला असं बोलले गेले. मात्र आता खुद्द सौदी अरेबियाच्या प्रिंसनं पाकिस्तानच्या पंतप्रधानासमोर हे विधान करत जम्मू काश्मीर प्रकरणात भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चेतून मार्ग निघेल ती द्विपक्षीय चर्चा आहे असं स्पष्ट केले आहे.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाPakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर