शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

India China Faceoff : मोठा खुलासा! चीनने 'या' भीतीने लपवला मृत सैनिकांचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 13:37 IST

India China Faceoff : भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले.

पेईचिंग  - भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला.  भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे 43 सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. मात्र चीनने अद्याप मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही. तणाव वाढवायचा नसल्यामुळे आकडा जाहीर करणार नसल्याचं चीनने म्हटलं आहे. पण आता चीनबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. अमेरिकेच्या भीतीमुळे चीनने मृत सैनिकांचा आकडा लपवला असल्याची माहिती समोर आली आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीन आणि अमेरिका यांच्यात एक महत्त्वाची बैठक होणार होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चीनने भारतासोबत घडलेली घटना किरकोळ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. या धोरणांतर्गत चीनने मृत सैनिकांचा आकडाही जाहीर केला नाही. चीनी सैन्याचे प्रवक्‍ते झांग शुइली यानी हिंसक झटापटीत दोन्ही बाजूंनी जीवितहानी झाली आहे असं सांगितलं मात्र मृतांचा आकडा सांगण्यास नकार दिला आहे. 

पीएलएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या सैनिकांच्या मृत्यूबद्दल चीन अत्यंत संवेदनशील आहे. सैनिकांच्या मृत्यूचे आकडे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या मंजुरीनंतरच समोर येतील. शी जिनपिंग हेच सैन्याचे अध्यक्ष आहेत. त्यामुळ यामागे त्यांचाच संबंध आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांच्यासोबत बैठक होणार होती. भारता-चीन सीमा वादावर यामध्ये चर्चा करण्यात आली. अमेरिकेसोबतच्या या बैठकीत भारतासोबतच्या संघर्षाचा मुद्दा उचलला जाऊ शकतो, ही भीती चीनला होती. चीनला काहीही करुन पॉम्पियो-यांग यांच्या बैठकीअगोदर तणाव कमी करायचा होता. पण एखादा देश या तणावाचा गैरफायदा घेत असेल, तर आमच्या सैनिकांना योग्य ते उत्तर देता येतं असं म्हटलं आहे. 

संयुक्त राष्ट्रानंतर अमेरिकेनेही आता शांततापूर्ण परिस्थितीत वाद मिटवण्याचं आवाहन केलं आहे. अमेरिकन गृह विभागाने शहीद झालेल्या भारतीय जवानांविषयी सहवेदना व्यक्त केली. भारत आणि चीन यांच्यातील एलएसीवर घटनाक्रमावर अमेरिकेचं लक्ष असल्याचं सांगण्यात आलं आहे. चीनमधील विश्लेषकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतही चर्चा करण्याची शक्यता आहे. कारण ते आर्थिक महत्त्व ओळखून आहेत असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 21 महिने झाले तरी वडिलांनी केले नाहीत मुलावर अंत्यसंस्कार; 'हे' आहे कारण 

CoronaVirus News : अरे व्वा! साडी खरेदीवर महिलांना मिळतंय खास 'कोरोना कवच'; जाणून घ्या 'हे' नेमकं आहे तरी काय? 

CoronaVirus News : 'त्याच्या' जिद्दीला सलाम! आईचं औषध अन् भावंडांच्या शिक्षणासाठी उचलतोय कोरोनाग्रस्तांचे मृतदेह

Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका! सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

CoronaVirus News : बापरे! 'या' व्यक्तींसाठी कोरोना ठरतोय जीवघेणा; 12 पट अधिक आहे मृत्यूचा धोका

टॅग्स :IndiaभारतchinaचीनBorderसीमारेषाborder disputeसीमा वादDeathमृत्यूIndian Armyभारतीय जवान