शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

India China Faceoff: लष्करी कारवायांसाठी नेपाळकडून चीनला सर्वात मोठ्ठं 'गिफ्ट'?; भारतीय यंत्रणा अलर्ट मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 10:49 AM

नेपाळचे भूभाग चीननं बळकावले; भारतीय यंत्रणा सतर्क

ठळक मुद्देनेपाळनं चीनला जाणूनबुजून आपली जमीन दिल्याचा संशयचीननं बळकावलेल्या नेपाळी जमिनीची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरूचीनच्या नेपाळमधील हालचाली पाहून भारतीय यंत्रणा सतर्क

नवी दिल्ली: चीनच्या कुरघोड्यांमुळे लडाख सीमेवरील तणाव वाढला आहे. चीनकडून होणाऱ्या आगळिकींना प्रत्युतर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे. त्यातच चीननं नेपाळच्या जमिनीवर कब्जा केला आहे. या मागच्या व्यूहनीतीचं विश्लेषण सध्या भारताकडून सुरू आहे. चीननं नेपाळचा नेमका कोणता भूभाग बळकावला आहे, याची माहिती मिळवण्याचं काम सध्या भारताकडून सुरू आहे. चीननं नेपाळी जमिनीवर अतिक्रमण केलं की नेपाळनं आपला भूभाग जाणूनबुजून चीनला दिला, याबद्दलचे तपशीलही गोळा केले जात आहेत.चीननं नेपाळची जमीन ताब्यात घेतल्याचा परिणाम भारतीय सीमेवर होणार नाही ना, याचा शोध भारताकडून घेतला जात आहे. इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाईम्सनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 'नेपाळच्या राजकारण्यांनी किंवा पंतप्रधान केपी शर्मा ओली सरकारनं देशाची जमीन चीनला दान केली आहे का, याबद्दलची माहिती गोळा करण्याचं काम भारत सरकारकडून सुरू आहे. नेपाळनं जमीन दान दिलेली असो किंवा मग चीननं ती बळकावली असो, दोन्ही परिस्थितीत भारत आणि चीनचे संबंध बिघडू शकतात. कारण चीन सातत्यानं शेजारी देशांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करतो,' असं ईटीनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.पंतप्रधान ओली यांच्यासह नेपाळ सरकारमधील वरिष्ठांनी चीनची चाल समजून घ्यायला हवी, असं नेपाळच्या जाणकारांना वाटतं. आपली खुर्ची कायम ठेवण्यासाठी ओली चीनच्या जवळ जात आहेत. मात्र त्यामुळे भारत आणि नेपाळचे संबंध बिघडत असल्याचं जाणकार सांगतात.चीन भूभाग बळकावतोय; नेपाळ सरकारचा अहवालचीनच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यानं भारताच्या जमिनीवर दावा सांगणाऱ्या नेपाळला आता वेगळीच भीती सतावू लागली आहे. भारतापासून दूर गेलेल्या नेपाळला आता चीनच्या विस्तारवादाचा फटका बसू लागला आहे. तिबेटमधील रस्ते निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून चीन नेपाळमधील जागा बळकावण्याच्या प्रयत्नात आहे. चीन भविष्यात सीमेवर सैन्य चौक्या उभारेल, अशी भीती नेपाळ सरकारनं अहवालातून व्यक्त केली आहे. भारत आणि चीनच्या सैन्यात लडाखमधील गलवानमध्ये हिंसक झटापट झाल्यानंतर नेपाळ सरकारनं अहवाल प्रसिद्ध केला. नद्यांचे प्रवाह बदलून नेपाळी भूभाग बळकावलेनेपाळी कृषी मंत्रालयाच्या सर्वेक्षण विभागानं ११ जागांची यादी तयार केली होती. यातल्या ११ जागांवर चीननं अतिक्रमण केलं आहे. या भागाचं एकूण क्षेत्रफळ ३३ हेक्टर्स इतकं आहे. अधिक भूभाग बळकवण्यासाठी चीनकडून नद्यांचे प्रवाह बदलण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही नेपाळ सरकारनं अहवालात नमूद केलं आहे. हुमला जिल्ह्यातील बगदारे खोला आणि कर्नाली नदीच्या पात्रात बदल करून चीननं १० हेक्टर जमीन बळकावली आहे. तर रासुवा जिल्ह्यातील सहा हेक्टर जागादेखील चीननं ताब्यात घेतली आहे. चीनच्या कारवायांची थक्क करणारी गती; भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळला सतावतेय वेगळीच भीतीनाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललंभारत आमच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत; पाकिस्तानला सतावतेय भीती

टॅग्स :chinaचीनIndiaभारतNepalनेपाळ