शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

पाणीटंचाईमुळे मानवी स्थलांतराचा मोठा धोका

By admin | Published: May 05, 2016 3:09 AM

हवामान बदलामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई विकासावर परिणाम करून मानवी स्थलांतराला भाग पाडू शकते व भारतासह जगभर संघर्ष होऊ शकतो, असा इशारा जागतिक बँकेने

वॉशिंग्टन : हवामान बदलामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई विकासावर परिणाम करून मानवी स्थलांतराला भाग पाडू शकते व भारतासह जगभर संघर्ष होऊ शकतो, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. सध्या भारतात अनेक ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे. जागतिक बँकेच्या ‘हाय अँड ड्राय : क्लायमेट चेंज, वॉटर अँड इकॉनॉमी’ या नावाचा हा अहवाल मंगळवारी प्रसिद्धीस देण्यात आला. त्यात म्हटले आहे की, वाढती लोकसंख्या, वाढते उत्पन्न आणि विस्तारणाऱ्या शहरांत पाण्याची मागणी प्रचंड वेगाने वाढत असून, ती अधिकच वाढणार आहे. त्या तुलनेत पुरवठा अनियमित व खात्रीचा नाही. जगातच पाणीटंचाई ही आर्थिक स्थैर्य आणि विकासाला बाधक ठरली आहे व त्यात हवामान बदलाने भयंकर भर घातली आहे, असे जागतिक बँकेचे जिम योंग किम यांनी म्हटले. फार मोठ्या लोकसंख्येचे जे देश जलस्रोतांचे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करणार नाहीत तेथील लोक प्रदीर्घ काळपर्यंत नकारात्मक आर्थिक परिस्थितीत राहतील, असे जिम किम यांनी म्हटले.भारतात पाण्याच्या बचतीची गरज भारतात पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व कार्यक्षमरीत्या करण्याची गरज असल्याचेही जागतिक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. भारतात पाण्याची मागणी वाढत असून पाणीटंचाईही वाढती आहे. गुजरातेत भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. यापुढे गुजरातमधून पाणी मिळविणे खूप खर्चिक झाले आहे. तेथील शेतकरी पीक पद्धतीत बदल करणे किंवा सिंचनासाठी तंत्रज्ञानाचा अधिक कार्यक्षम उपयोग करण्याऐवजी शहरांत स्थलांतर करीत आहेत, असे जागतिक बॅँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.