शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

"बांगलादेश आता पुढचा पाकिस्तान होणार, हसीना पुन्हा परतणार नाहीत"; अमेरिकेतील मुलाशी झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 10:08 IST

sheikh hasina Bangladesh Clash: हसीना यांनी ब्रिटनकडे राजनैतिक आश्रय मागितल्याचे वृत्त होते. ते जॉय यांनी फेटाळले आहे. एनडीटीव्ही, आजतकला जॉय यांनी मुलाखत दिली आहे. आपल्या आईला बांगलादेश सोडायचा नव्हता, परंतू तिची सुरक्षा पाहता आम्ही तिला समजावले असे जॉय म्हणाले

बांगलादेश आता पुढचा पाकिस्तान होणार असल्याचे धक्कादायक वक्तव्य शेख हसीना यांच्या मुलाने केले आहे. तसेच शेख हसीना यांच्याशी आज सकाळी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. सजीब वाजेद जॉय हे कुटुंबासह अमेरिकेत असतात, हसीना देखील आता नातवांसोबत अमेरिकेतच राहतील असेही जॉ़य यांनी स्पष्ट केले आहे. 

मोठा दावा! शेख हसीनांना आर्मीनेच बांगलादेश सोडायला भाग पाडले, दिली ४५ मिनिटे...

हसीना यांनी ब्रिटनकडे राजनैतिक आश्रय मागितल्याचे वृत्त होते. ते जॉय यांनी फेटाळले आहे. एनडीटीव्ही, आजतकला जॉय यांनी मुलाखत दिली आहे. आपल्या आईला बांगलादेश सोडायचा नव्हता, परंतू तिची सुरक्षा पाहता आम्ही तिला समजावले असे जॉय म्हणाले. हसीना यांनी बांगलादेशाला स्थिर आणि चांगले सरकार दिले होते. बांगलादेशाला विकासाच्या मार्गावर नेले होते. त्यांनी दहशतवादाचा मुकाबला केला होता. बांगलादेशाच्या सध्याच्या परिस्थितीवर त्या हताश आणि निराश असल्याचे जॉ़य यांनी सांगितले. 

देशातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याची ताकद वापरणे गरजेचे झाले होते. परंतू, विद्यार्थ्यांविरोधात सैन्याचे बळ वापरण्यास हसीना यांनी विरोध केला. यामुळे त्यांनी आपणच राजीनामा देणे उचित समजले. या सर्व घटनाक्रमात जमात ए इस्लामीची भूमिका आहे. यामध्ये सामान्य बांगलादेशी मुळीच सहभागी नाहीत, असे जॉय म्हणाले. तसेच आम्ही आमच्या नेत्यांचे संरक्षण नक्कीच करू. १९७५ मध्येही पक्षाच्या नेत्यांची हत्या झाली होती. आम्हाला तशीच परिस्थिती पुन्हा नको होती. परंतू आता बांगलादेशाच्या भविष्याची जबाबदारी आमची राहिलेली नाही, असे स्पष्ट शब्दांत जॉय म्हणाले.

आता बांगलादेश पुढील पाकिस्तान होणार आहे. आम्ही सैन्यावर टीका करणार नाही. हेच त्यांचे नशीब आहे. हसीना पुन्हा कधीही बांगलादेशला परतणार नाहीत. त्या ७७ वर्षांच्या आहेत. त्यांची राजकारणातील ही शेवटची टर्म होती. त्या निवृत्त होणार होत्या. चीनने देशाच्या कारभारात कधीच हस्तक्षेप केलेला नाही. त्यांचा यात हात नाही. बांगलादेशाला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतू आता हसीना लोकांना वाचविण्यासाठी परत येणार नाहीत, असे उद्विग्न सूर जॉय यांनी काढले. 

आमच्या पक्षाच्या नेत्यांवर हल्ले केले जात आहेत. मला वाटत नाही निष्पक्ष निवडणूक होईल. आमच्या कुटुंबाने बांगलादेशात विकास करून दाखविला आहे. जर आता बांगलादेशचे लोक सोबत उभे राहण्यास इच्छुक नसतील तर लोकांना तेच नेतृत्व मिळेल ज्याचे ते हकदार आहेत, असे जॉय यांनी सांगितले. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश