शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

अमेरिकेचा मोठा खुलासा; पूर्वनियोजित होती गलवानची चकमक, असा होता चीनचा 'इरादा'

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 02, 2020 5:01 PM

अमेरिकेच्या अहवालात म्हणण्यात आले आहे, की गलवानमधील हिंसक चकमक पूर्वनियोजित होती आणि याचे सबळ पुरावेही आहेत. या अहवालात अमेरिकेने म्हटले आहे, की चीनला जमिनीवरच कब्जा करायचा असता, तर त्याने अशा चकमकी ऐवजी संपूर्ण लढाईच केली असती.

वॉशिंग्टन - पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी)  भारत आणि चीनदरम्यानचा तणाव अद्यापही कमी झालेला नाही. अनेक वेळा चर्चा होऊनही हा वाद अद्याप संपलेला नाही. या दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर समोरा-समोर तैनात आहे. भारत आणि चीन यांच्यातील या तणावातच अमेरिकेकडून एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. अमेरिकेने यावर्षीच 15 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. यामुळे चीनचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

अमेरिकेच्या अहवालात म्हणण्यात आले आहे, की गलवानमधील हिंसक चकमक पूर्वनियोजित होती आणि याचे सबळ पुरावेही आहेत. या अहवालात अमेरिकेने म्हटले आहे, की चीनला जमिनीवरच कब्जा करायचा असता, तर त्याने अशा चकमकी ऐवजी संपूर्ण लढाईच केली असती. मात्र, गलवान हिंसक चकमकीचे कारण या अहवालात स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेले नाही. पण चीनने आपल्या सैन्यासाठी स्ट्रॅटेजिक रूट तयार करण्याच्या हेतूने ही चकमक घडवून आणली, असा अंदाज लावण्यात आला आहे.

चीनने भारतासह आपल्या ज्या शेजारील देशांचे अमेरिकेसोबत चांगले ट्रेड संबंध आहेत, अशा देशांना टार्गेट केले आहे. या अहवालात चीनविरोधात कठोर पावले उचलने आवश्यक असल्याची मागणीही करण्यात आली आहे. अर्थात, डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर ज्यो बायडन यांच्यसमोर हे एक मोठे आव्हान असेल. एवढेच नाही, तर चीनची पाकिस्तानच्या डिफेंस स्पेसमधील दखलही मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचेही या अहवालात म्हणण्यता आले आहे.

भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये गेल्या 15 जूनला गलवान खोऱ्यात हिंसक झडप झाली होती. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले होते. यात मोठ्या संख्येने चिनी सैनिकही मारले गेले होते. मात्र, चीन यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती देत नाही. गलवान संघर्षापासूनच दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. हा वाद सोडविण्यासाठी अनेक वेळा उभय देशांत चर्चाही झाल्या आहेत. मात्र, सहमती झाल्यानंतरही चीन आपल्या विस्तारवादी नीतीने धोकेबाजी करत आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाchinaचीनIndiaभारतladakhलडाखSoldierसैनिक