शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

"अफगाणिस्तानातील परिस्थिती चिंताजनक, काही देश दहशतवादाची मदत करतायत"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 10:43 PM

Afghanistan Taliban Crisis : नाव न घेता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा. UNSC च्या बैठकीत अफगाण संकटावर परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य.

ठळक मुद्दे नाव न घेता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा.UNSC च्या बैठकीत अफगाण संकटावर परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) बोलताना अफगाण संकटावर मोठं वक्तव्य केलं. काही देश दहशतवादाची मदत करत आहेत, त्यांना थांबवणं आवश्यक आहे, असं पाकिस्तानचं नाव न घेता जयशंकर म्हणाले. "दहशतवादाची प्रत्येक रूपात निंदा केली गेली पाहिजे. दहशतवादाचा कोणीही गौरव करू नये. दहशतवादाविरोधात संपूर्ण जगानं एकत्र येणं आवश्यक आहे. दहशतवादाच्या लढाईत भारत पूर्णपणे पुढेही सहकार्य करण्यास तयार आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं. 

सध्या भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) अध्यक्षस्थानी आहे. गुरूवारी या सुरक्षा परिषदेत दहशतवादी कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी निर्माण होत असलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. "दहशतवादाला कोणताही धर्म, राष्ट्र, संस्कृती किंवा जातीय समुहाशी जोडून पाहिलं जाऊ शकत नाही. दहशतवादाचा कायम निषेध केला गेला पाहिजे," असं जयशंकर म्हणाले.  जयशंकर यांनी यावेळी कोरोनाचं उदाहरण देत म्हटलं, की जे कोरोनासाठी सत्य आहे, तेच दहशतवादासाठी सत्य आहे. जोपर्यंत सर्व सुरक्षित होणार नाहीत, तोवर कोणीही सुरक्षित राहणार नाही. अफगाणिस्तान असेल किंवा भारत, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद सारख्या दहशवादी संघटना सतत सक्रिय असल्याचंही ते म्हणाले. 

दहशतवाद्यांना बिटकॉईनच्या माध्यमातून बक्षीस एस. जयशंकर यांनी बोलताना ISIS चा उल्लेख केला. "दहशवतादी संघटना ISIS चा पाया मजबूत होत आहे. दहशतवाद्यांना जीव घेण्याच्या मोबदल्यात बिटकॉईन्स बक्षीस म्हणून दिल्या जात आहेत. तरूणांना ऑनलाइन पद्धतीनं अपप्रचार करून भटकवण्याचं काम केलं जात आहे," असंही ते म्हणाले. "जेव्हा आम्ही पाहतो की कोणाचे हात एखाद्याच्या रक्तानं रंगलेले असतील आणि त्यांचं कोणता देश स्वागत करतो, सुविधा पुरवतोय, तेव्हा आम्ही बोलण्याचं धाडस नक्कीच करतो. भारतानं भरपूर दहशतवाद सहन केला आहे. २००८ मध्ये मुंबई हल्ला, २०१६ पठाणकोट एअरबेस हल्ला. २०१९ मध्ये पुलवामा, परंतु आम्ही दहशतवादासोबत कधीच तडजोड केली नाही," असंही जयशंकर यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद