शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
3
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
4
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
5
नेत्रदीपक भरारी! पायल कपाडियांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
6
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
7
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
8
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
9
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
10
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
11
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
12
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
13
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
14
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
15
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
16
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
18
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
19
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
20
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बिलासपूरचा वुमन्स हॉकी संघ ठरला ध्यानचंद कपचा मानकरी

By जितेंद्र दखने | Updated: October 2, 2023 18:58 IST

ऑल इंडिया वुमन्स हॉकी स्पर्धा: अंतिम सामन्यात केली मुंबईवर मात

अमरावती : श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या ऑल इंडिया वुमेन्स हॉकी टुर्नामेटंच्या अंतिम सामन्यात खेलो इंडिया बिलासपूरच्या तरुणींनी साई मुंबई टिमवर मात करीत विजय प्राप्त करत मेजर ध्यानचंद कपवर आपले नाव कोरले आहे.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त जेसीआय इंडिया आणि अमरावती जिल्हा महिला हॉकी अकादमीच्या वतीने २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ऑल इंडिया वुमेन्स हॉकी टुर्नामेंटचे आयोजन केले होते.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब पुसदेकर, सदस्य श्री हेमंत काळमेघ, सुभाष बनसोड, माजी महापौर विलास इंगोले, जेसीआयचे अध्यक्ष राजेश खंडेलवाल, संजय आचलिया, संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन कदम, सुभाष पावडे, पप्पू पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख बँकेचे अध्यक्ष नरेश पाटील, बाजार समितीचे सभापती हरीश मोरे, सभासद शरद भुयार, सुमित कलंत्री, कमलकिशोर मालाणी आदी उपस्थित होते. या स्पर्धेत बिलासपूर, दिल्ली, पटणा, कोलकाता, मुंबई, जालंधर, जम्मू काश्मीर, जबलपूर आदी ठिकाणाच्या महिला हॉकी संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेलो इंडिया स्कू बिलासपूर विरुद्ध साई एनसीओई मुंबई यांच्यातील अत्यंत रोमांचक अशा लढतीत बिलासपूरच्या टिमने विजय प्राप्त केला आहे. तर स्टील प्लांट्स स्पोर्ट बोर्ड दिल्लीचा संघ तिसरा विजेता ठरला आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला चंद्रकुमारजी जाजोदिया, नरेश पाटील व हेमंत काळमेघ, यशोमती ठाकूर आदीकडून रोख रक्कम व ट्राफी देऊन गौरविण्यात आले. यासोबतच उत्कृष्ट गोल किपर म्हणून मुंबईची कोमल हिचा, टॉप स्कोरर म्हणून मुंबईची चैत्रानी दास हिचा तर प्लेयर ऑफ दि टुर्नामेंटचा खिताब दिल्लीची राखी हिला देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तावित प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे यांनी तर आभार नम्रता पावडे यांनी केले. या कार्यक्रमाला खेळाडू, टीम मॅनेजर, कोच, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.