शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आत्मा उपलब्ध करणार भाजीपाला विक्रीची बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:55 PM

शहरातील नागरिकांना सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता यावा, त्यातून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळावा या उद्देशाने आत्मा केंद्र शेतकºयांसाठी भाजीपाला विक्रीचा बाजार उभारणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील नागरिकांना सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता यावा, त्यातून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळावा या उद्देशाने आत्मा केंद्र शेतकºयांसाठी भाजीपाला विक्रीचा बाजार उभारणार आहे.शेतकºयांनी पिकविलेल्या शेतमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकºयांना मोठा तोटा सहन करावा लागतो. तसेच शहरातील नागरिकांनाही ताजा व सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला शोधूनही सापडत नाही. शहरातील ग्राहकांचा संबंध थेट शेतकºयाशी आला तर शेतकºयांच्या मालाला चांगला भाव मिळू शकतो. विक्रीसाठी मध्यस्थी व्यापाºयांचा संबंधच येणार नसल्याने ते पैसे शेतकºयांनाच मिळणार आहेत. या उद्देशाने कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकºयांना भाजीपाला विक्रीसाठी काही ओटे बनविण्यात येणार आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तर्फे यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. लवकरच ही सुविधा शेतकºयांसाठी चालू करण्यात येणार असल्याचे आत्मा केंद्राचे प्रकल्प उपसंचालक युवराज शहारे यांनी सांगितले. शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेतकºयांना कसरत करावी लागते. त्यामध्ये वेळही अधिक जातो.शेतीचे इतर कामे सोडून शेतमाल विक्री करणे शेतकºयाला परवडत नाही. त्यामुळे शेतमाल चांगल्या किंमतीत विक्री करणे ही शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरते आहे. शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला माल व्यापारी कवडीमोल दरात खरेदी करुन चढ्या दराने त्याची विक्री करतात. त्याचा भुर्दंड शेतकºयांसह ग्राहकांनाही सहन करावा लागतो. ही बाजारपेठ सुरु झाल्यास ग्राहक व शेतकरी या दोघांचाही फायदा होणार आहे.मार्चमध्ये सुरु होणार बाजारपेठजिल्ह्यात आत्मा केंद्राचे १२९७ शेतकरी गट आहेत. या गटांत जवळपास १३ ते १५ हजार शेतकºयांचा समावेश आहे. या शेतकºयांना सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन व विक्रीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर मार्च महिन्याअखेर बाजारपेठ सुरु होणार असल्याचे आत्माचे युवराज शहारे यांनी सांगितले.केवळ शेतकºयांसाठीच असणार बाजारपेठकृषी अधीक्षक कार्यालयासमोर रस्त्यालगत २० बाय १५ आणि ३० बाय २० या आकाराचे दोन शेड व ओटे उभारण्यात येणार आहे. यासाठी किमान दोन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. ही बाजारपेठ जिल्ह्यातील सर्व शेतकºयांसाठी असणार आहे. त्यामध्ये आत्मा गटांच्या शेतकºयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कृषी अधीक्षक कार्यालयासमोरील जागा दर्शनी भागात आहे. येथे शहरातील नागरिकांची मोठी वर्दळ असतो. त्याचा फायदा या बाजारपेठेला होणार आहे. शेतकºयांनी उत्पादित केलेला सर्वच माल येथे विक्री करता येणार आहे.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार