शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सोलर पॉवर! नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ८ हजार घरे विजेच्या वापराबाबत स्वयंपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 14:28 IST

आठ हजार घरांतून ३३ मेगावॅट सौर विजेची निर्मिती होत आहे

हिंगोली : नांदेडसह परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमधील ८ हजार ८६ घरे विजेच्या वापराबाबतीत स्वयंपूर्ण झाली असून, या घरांवर सौर पॅनेल बसवून संबंधित नागरिकांनी ३३ मेगावॅट विजेची निर्मिती केली आहे.

महावितरण कंपनीकडून ‘प्रधानमंत्री सूर्यघर योजना’ राबविली जात आहे. नांदेड परिमंडळात या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेची जनजागृतीही प्रभावीपणे केली जात आहे. या अंतर्गतच नांदेड जिल्ह्यात ३८५७ घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल बसवले आहेत. त्यातून १७.०७ मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती केली जात आहे. परभणी जिल्ह्यात ३०२२ घरांवरील पॅनेल्समधून ११.२३ मेगावॅट तर हिंगोली जिल्ह्यात १२७७ घरांवर बसवलेल्या पॅनेल्सच्या माध्यमातून ४.५३ मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती केली जात आहे. नांदेड परिमंडळातील या तिन्ही जिल्ह्यांत मिळून ३२.८३ मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती होत आहे.

या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणने पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असणारी गावे ‘सोलार व्हिलेज’ म्हणून निवडली आहेत. घराच्या छतावरील सौर ऊर्जा पॅनेलद्वारे झालेली वीज निर्मिती घरगुती वापरापेक्षा अधिक असल्यास वीजबिल शून्यावर येते. तसेच महावितरणला ही वीज विकून उत्पन्न मिळवण्याची संधीही या योजनेत आहे. एक किलोवॅटच्या सौर वीज निर्मिती प्रकल्पातून महिन्याला २४० युनिट तर ३ किलोवॅटच्या प्रकल्पातून सर्वसाधारणपणे ३६० युनिट विजेची निर्मिती होऊ शकते.

टॅग्स :electricityवीजHingoliहिंगोली