शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

वाकोडीच्या वसाहतीचा प्रस्ताव प्रादेशिक उपायुक्तांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:28 IST

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत मागील तीन वर्षांपासून कळमनुरी तालुक्यातील वाकोडीचा प्रस्ताव या टेबलावरून त्या टेबलावर फिरत असून एकमेव प्रस्ताव असताना तोही मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या समाजा जमीन उपलब्ध करून तेथे वसाहत उभी करून देण्याची ही योजना आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत मागील तीन वर्षांपासून कळमनुरी तालुक्यातील वाकोडीचा प्रस्ताव या टेबलावरून त्या टेबलावर फिरत असून एकमेव प्रस्ताव असताना तोही मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या समाजा जमीन उपलब्ध करून तेथे वसाहत उभी करून देण्याची ही योजना आहे.कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील प्रस्ताव मागील दोन वर्षांपासून टोलवाटोलवीच्या फेऱ्यात आहे. एक अडचण दूर झाली की, दुसरी समोर आ करून उभी असते. त्यामुळे या गावातील लाभार्थ्यांना खरेच या योजनेत लाभ मिळेल की नाही, यावरील प्रश्नचिन्ह आहे. जमीन मोजणीची तरतुदीची मागणी प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्तांकडे केली होती. ती लवकरच होईल, असे सांगण्यात आले आहे. सध्या ग्रामीण भागात जागा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे भटक्या विमुक्त जातीकडे जागा उपलब्ध असेल तर त्यांना ७० हजार रूपयांचे अनुदान दिल्या जाते. परंतु जागा मिळेपर्यंत यात अडचणी येतात, असे विशेष समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांनी सांगितले.वाकोडी येथे दहा ते वीस लाभार्थ्यांना या योजनेत लाभ देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या योजनेत वसाहतीसह इतर सर्वच सुविधाही मिळत असल्याने या योजनेतील घरकुलाला वेगळे महत्त्व आहे. नागरि सुविधांच्या धर्तीवरील या सुविधा राहणार असल्याने वाकोडीचा प्रस्ताव मार्गी लागावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.अशी आहे योजना४योजनेतर्गत राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवगार्तील कुटुंबांचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या उत्त्पनाचे स्त्रोत वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी ग्रामीण भागामध्ये अशा कुटुंबांना प्रत्येकी ५ गुंठे जमीन उपलब्ध करून त्यावर २६९ चौरस फुटाची घरे बांधून देणे व उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबांना विविध शासकीय योजनांद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येते.४ या योजनेतर्गत लाभार्थी कुटुंबांना मिळणारा भूखंड व त्यावरील घर हे संयुक्तपणे पती व पत्नीच्या नावे केले जाईल. मात्र विधवा व परित्यक्ता स्त्रियांच्या बाबतीत भूखंड व त्यावरील घर त्यांच्या नावेच केले जातील. या योजनेत मिळालेला भूखंड व त्यावरील घर लाभार्थी कुटुंबास कोणत्याही कारणास्तव कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरीत करता येत नाही. विकता येत नाही. योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीस देता येतो. भूखंडावरील जागेचा वापर हा कायदेशीर उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी असणे बंधनकारक राहील. तर घरे भाडे तत्त्वावर अन्य व्यक्ती, कुटुंबास देता येणार नाही.पोटभाडेकरूसुद्धा ठेवता येणार नाही. तसे आढळून आल्यास सदरचा लाभ रद्द करता येऊ शकतो.४यासाठी लाभार्थी कुटुंब हे विमुक्त जाती, भटक्या जमाती या मूळ प्रवगार्तील तसेच गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारे असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये १ लाखापेक्षा कमी असावे, कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर नसावे, कुटुंब हे झोपडी, कच्चे घर,पालमध्ये राहणारे असावे, कुटुंब हे भूमिहीन असावे, लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा, कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कुठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, वर्षभरात किमान ६ महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा.

टॅग्स :HingoliहिंगोलीHomeघर