शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

वाकोडीच्या वसाहतीचा प्रस्ताव प्रादेशिक उपायुक्तांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:28 IST

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत मागील तीन वर्षांपासून कळमनुरी तालुक्यातील वाकोडीचा प्रस्ताव या टेबलावरून त्या टेबलावर फिरत असून एकमेव प्रस्ताव असताना तोही मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या समाजा जमीन उपलब्ध करून तेथे वसाहत उभी करून देण्याची ही योजना आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत मागील तीन वर्षांपासून कळमनुरी तालुक्यातील वाकोडीचा प्रस्ताव या टेबलावरून त्या टेबलावर फिरत असून एकमेव प्रस्ताव असताना तोही मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या समाजा जमीन उपलब्ध करून तेथे वसाहत उभी करून देण्याची ही योजना आहे.कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील प्रस्ताव मागील दोन वर्षांपासून टोलवाटोलवीच्या फेऱ्यात आहे. एक अडचण दूर झाली की, दुसरी समोर आ करून उभी असते. त्यामुळे या गावातील लाभार्थ्यांना खरेच या योजनेत लाभ मिळेल की नाही, यावरील प्रश्नचिन्ह आहे. जमीन मोजणीची तरतुदीची मागणी प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्तांकडे केली होती. ती लवकरच होईल, असे सांगण्यात आले आहे. सध्या ग्रामीण भागात जागा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे भटक्या विमुक्त जातीकडे जागा उपलब्ध असेल तर त्यांना ७० हजार रूपयांचे अनुदान दिल्या जाते. परंतु जागा मिळेपर्यंत यात अडचणी येतात, असे विशेष समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांनी सांगितले.वाकोडी येथे दहा ते वीस लाभार्थ्यांना या योजनेत लाभ देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या योजनेत वसाहतीसह इतर सर्वच सुविधाही मिळत असल्याने या योजनेतील घरकुलाला वेगळे महत्त्व आहे. नागरि सुविधांच्या धर्तीवरील या सुविधा राहणार असल्याने वाकोडीचा प्रस्ताव मार्गी लागावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.अशी आहे योजना४योजनेतर्गत राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवगार्तील कुटुंबांचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या उत्त्पनाचे स्त्रोत वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी ग्रामीण भागामध्ये अशा कुटुंबांना प्रत्येकी ५ गुंठे जमीन उपलब्ध करून त्यावर २६९ चौरस फुटाची घरे बांधून देणे व उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबांना विविध शासकीय योजनांद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येते.४ या योजनेतर्गत लाभार्थी कुटुंबांना मिळणारा भूखंड व त्यावरील घर हे संयुक्तपणे पती व पत्नीच्या नावे केले जाईल. मात्र विधवा व परित्यक्ता स्त्रियांच्या बाबतीत भूखंड व त्यावरील घर त्यांच्या नावेच केले जातील. या योजनेत मिळालेला भूखंड व त्यावरील घर लाभार्थी कुटुंबास कोणत्याही कारणास्तव कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरीत करता येत नाही. विकता येत नाही. योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीस देता येतो. भूखंडावरील जागेचा वापर हा कायदेशीर उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी असणे बंधनकारक राहील. तर घरे भाडे तत्त्वावर अन्य व्यक्ती, कुटुंबास देता येणार नाही.पोटभाडेकरूसुद्धा ठेवता येणार नाही. तसे आढळून आल्यास सदरचा लाभ रद्द करता येऊ शकतो.४यासाठी लाभार्थी कुटुंब हे विमुक्त जाती, भटक्या जमाती या मूळ प्रवगार्तील तसेच गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारे असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये १ लाखापेक्षा कमी असावे, कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर नसावे, कुटुंब हे झोपडी, कच्चे घर,पालमध्ये राहणारे असावे, कुटुंब हे भूमिहीन असावे, लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा, कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कुठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, वर्षभरात किमान ६ महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा.

टॅग्स :HingoliहिंगोलीHomeघर