शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची संख्या वाढली; थांबे मात्र वाढेनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

हिंगोली : कोरोना महामारी ओसरत चालल्याचे पाहून प्रवाशांच्या मागणीनुसार ‘डेमो’ ही पॅसेंजर रेल्वे सुरु केली आहे. इतर एक्सप्रेस रेल्वेही ...

हिंगोली : कोरोना महामारी ओसरत चालल्याचे पाहून प्रवाशांच्या मागणीनुसार ‘डेमो’ ही पॅसेंजर रेल्वे सुरु केली आहे. इतर एक्सप्रेस रेल्वेही सुरु आहेत. परंतु, थांबे मात्र वाढलेली नाहीत. प्रवासी संख्या वाढल्यास रेल्वे विभाग थांब्याबाबत निर्णय घेईल, असे स्टेशनमास्टर अलोक यांनी सांगितले.

कोरोना महामारी अजून संपलेली नाही. रोजच्या रोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाआधी सारखी प्रवासी संख्याही सध्या नाही. रोज ५० ते ६० प्रवासी हे प्रवास करताना आढळून येत आहेत. मध्यंतरी पॅसेंजर गाडी नाही म्हणून प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे विभागाने ‘डेमो’ रेल्वे सुरु केली आहे. परंतु, प्रवासी मात्र या ‘डेमो’ गाडीला मिळत नाहीत. रेल्वे विभागाने ज्या ठिकाणी थांबे दिले आहेत त्याच ठिकाणी रेल्वे थांबत आहेत. रेल्वेच्या सुचनेनुसार पुढील बंद असलेले थांबे सुरु होतील.

सध्या सुरु असलेल्या रेल्वे

नरखेड ते काचीगुडा

तितरुपती ते अमरावती

नांदेड ते श्रीनगर

नांदेड ते अमृतसर

इंदोर ते यशवंतपूर

अजमेर ते हैदराबाद

जयपूर ते हैदराबाद

कोल्हापूर ते नागपूर

थांब्याबाबतचा निर्णय रेल्वे विभाग घेणार...

कोरोना काळापासून काही थांबे बंद करण्यात आलेली आहेत. या थांब्याबाबतचा निर्णय प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे विभाग लवकरच घेईल. सध्या तरी एक ‘डेमो’ पॅसेंजर वगळता ९ एक्सप्रेस रेल्वे सुरु आहेत. डेमो रेल्वे सर्व थांब्यावर थांबत आहे.

कोरोना महामारी संपलेली नाही. त्यामुळे प्रवासी संख्या अजून तरी वाढलेली नाही. कोरोनाच्या नियमाबाबत प्रवाशांना वेळोवेळी सूचना दिली जात आहे. थांब्याबाबतचा निर्णय रेल्वे विभागाच्या अखत्यारित आहे.

-अलोक नारायण, रेल्वे स्टेशन मास्टर, हिंगोली

थांबा नसल्याने आम्हाला होतो त्रास...

एक्सप्रेस रेल्वे तर छोट्या थांब्यावर कधीच थांबत नाही. त्यामुळे अवैध वाहतुकीचा सहारा घेत शहराच्या ठिकाणी जावे लागते. डेमो रेल्वेही मोजक्याच ठिकाणी थांबत आहे. रेल्वे विभागाने थांब्याबाबत निर्णय घ्यावा, असे प्रवाशांनी सांगितले.

प्रवाशांनी मागणी केल्यामुळे रेल्वे विभागाने ‘डेमो’ रेल्वे सुरु केली आहे. परंतु, मोजक्याच ठिकाणी ‘डेमो’ थांबत आहे. त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. याबाबत स्टेशन मास्टरला काही प्रवाशांनी सांगितले. परंतु, महिना झाला अजून त्याचा काही विचार केला नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.