शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

किती ही लूट; मंडईत भेंडी १० रुपये, तर घराजवळ २० रुपये किलो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:31 IST

हिंगोली : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे पालेभाज्या भरपूर प्रमाणात पिकविल्या जात आहेत. परंतु, पालेभाजी विक्रेते मात्र वाटेल तो ...

हिंगोली : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे पालेभाज्या भरपूर प्रमाणात पिकविल्या जात आहेत. परंतु, पालेभाजी विक्रेते मात्र वाटेल तो दर लावून ग्राहकांची लूट करीत आहेत. त्यामुळे मंडईत दर वेगळा व घराजवळ आल्यानंतर भाजीचा दर वेगळा राहत असल्याचे असे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील औंढा नागनाथ, डिग्रस, कळमनुरी, आंबाचोंडी, जवळा बाजार, हट्टा, सवड, कनेरगाव, सेनगाव आदी गावांतील शेतकरी दोन पैसे मिळावेत म्हणून भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. परंतु, हल्ली त्यांच्या भाजीपाल्यांना मंडईत म्हणावा तेवढा भाव मिळत नाही. त्यामुळे काही शेतकरी भाजीपाल्याचे दुकान टाकून मंडईत बसत आहेत. काही व्यापारी कमी दराने भाजीपाला विकत घेत आहेत आणि नंतर चढ्याने त्याची विक्री करीत आहेत, असेही निदर्शनास आले. महागाईत काहीच परवडत नाही, असे छोट्या- मोठ्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोरोना महामारीमुळे तर शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले गेले आहे. जिल्हा प्रशासनाने व्यापारासाठी दिलेली वेळ कमी पडत आहे. त्यामुळे भाजीपाला घेतला तसाच घरी घेऊन जावा लागत आहे. त्यामुळे भाजीपाल्यांची नासाडी होत आहे, असेही मंडईतील व्यापाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

मंडईत वेगळा दर अन्‌ घराजवळ वेगळा...

सद्य:स्थितीत भाजीपाला मुबलक येत आहे. परंतु, भाज्यांच्या दरामध्ये मात्र बरीच तफावत आढळून येत आहे. कारले आरोग्याला चांगले असते म्हणून ग्राहक खरेदी करतात. मंडईत कारल्याचा दर ३० रुपये किलो असून घराजवळ विकत घेतल्यास त्याचा भाव ४० रुपये होतो. घासघीस केल्यानंतर ते ३५ रुपये किलोने देण्यास तयार होतात. दरामध्ये एवढी तफावत का आहे, असे विचाल्यास छोटे व्यापारी निरुत्तर होतात.

प्रतिक्रिया

अर्धापाव, किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही !

कोरोना महामारीमुळे बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अर्धापाव, किलोसाठी मंडईत जाणेही परवडत नाही. नाईलाजास्तव घराजवळ आलेल्या गाड्यावरुनच भाजी खरेदी करावी लागत आहे अन्‌ तीही वाढत्या दरानेच.

- शांताबाई थोरात, गृहिणी

दोन महिन्यांपूर्वी भाजीपाला स्वस्त मिळायचा. परंतु, आठ-दहा दिवसांपासून भाजीपाला महागच मिळत आहे. भाजीविनाच स्वयंपाक करण्याची वेळ सर्वच गृहिणींवर येवून ठेपली आहे. भाज्यांचा दर मंडईत वेगळा व घराजवळ वेगळाच आहे.

- सीमा नागरे, गृहिणी

हा बघा दरांमधील फरक (प्रति किलो दर)

भेंडी १०

२०

कारले ३०

४०

गवार ३५

४०

दोडके २५

३०

वांगे ५०

५५

आलू १५

२०

फूलकोबी २०

२५

पानकोबी १५

२०

मिरची २०

२५

चवळी २०

२५

ढोबळ मिरची २०

२५