शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

पाच दिवसांचा आठवडा तरीही दुपारीच दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:29 AM

पूर्वी दुसऱ्या व तिसऱ्या शनिवारी सुटी नसायची. त्यामुळे या दिवशी दुपारीच अनेक कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसायचा. आता शासनाने पाच दिवसाच्या ...

पूर्वी दुसऱ्या व तिसऱ्या शनिवारी सुटी नसायची. त्यामुळे या दिवशी दुपारीच अनेक कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसायचा. आता शासनाने पाच दिवसाच्या आठवड्याची संकल्पना अमलात आणली आहे. त्यामुळे तरी कर्मचारी पाच दिवस अंग झटून काम करतील, अशी अपेक्षा होती. मात्र तसे होताना दिसत नाही. कर्मचारी शुक्रवारी सकाळी हजर तर होतात, मात्र दुपारपर्यंतही त्यांचा पाय कार्यालयात टिकत नसल्याचे चित्र आहे. काहीजण कशीतरी दुपारपर्यंत कळ सोसून दुपारून मात्र निमित्त सांगून गायब होताना दिसत होते. दुपारनंतर जि.प., जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी कार्यालय, तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंचायत समिती या प्रमुख कार्यालयांतील उपस्थितीच ५० टक्क्यांच्याही खाली उतरल्याचे दिसत होते. इतर शासकीय कार्यालयांचा तर विचारच न केलेला बरा. काही ठराविक कार्यालयांमध्ये ठराविक कर्मचारीच जागेवर असल्याचे दिसून आले. तर काही कर्मचाऱ्यांना थांबण्याशिवाय तरणोपायच नसतो. त्यामुळे ते जागेवर असल्याचे दिसून येत होते. अन्यथा कंत्राटी कर्मचारीसुद्धा दुपारपासूनच गायब झाल्याचे चित्र पहायला मिळत होते.

काही दिवसांपूर्वी विविध कार्यालयात अधिकाऱ्यांनी तपासणीसत्र सुरू केले होते. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत थांबणे भाग पडत होते. आता अशी तपासणी बंद असल्याने अनेकांचे फावत आहे.