शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा टाहो ! पूर्णा प्रकल्पाचे पाणी कोणी तरी वाचवा हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 18:52 IST

 वाया जाणाऱ्या पाण्याने उलट नुकसानीच्या झळा

ठळक मुद्देदरवाजांना पैसे देण्याची शेतकऱ्यांची तयारीसहा महिन्यांतच दोन्ही धरणे रिकामी होण्यास वेळ लागणार नाही. 

- चंद्रकांत देवणे 

वसमत : पूर्णा प्रकल्पाच्या दुसऱ्या पाणीपाळीतही प्रचंड प्रमाणात पाणी वाया जात आहे. मायनरला दरवाजे न बसवताच पाणीपाळ्या देवून अधिकारी, कर्मचारी नांदेडला खुशाल राहत असल्याने पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे. पाच वर्षांत पाणी पाणी करत प्रचंड होरपळल्यानंतर आता असे पाणी वाया जात असल्याचे पाहून कोणी तरी पाणी वाचवा हो, असा आक्रोश शेतकरी करत आहेत. 

पूर्णा पाटबंधारेच्या पाण्यावर वसमतसह नांदेड, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तहानभूक अवलंबून आहे. तीन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा धरण भरल्याने आता किमान तीन वर्षे तरी पाणी कमी पडणार नाही, असा विश्वास व्यक्त होत होता.मात्र आता तर विचित्र चित्र समोर येत आहे. गेल्या पाच- सात वर्षांत कालवे-चाऱ्यांतून पाणी वाहिले नसल्याने चाऱ्या, मायनर गाळ व काटेरी झुडपे, गवताने भरून गेल्या आहेत. काही मायनर जमीनदोस्त झाले आहेत. आता पाणी पाळी देण्यापूर्वी ही सर्व मायनर, वितरिका, चाऱ्यांची दुरूस्ती करूनच पाणी सोडणे अपेक्षित होते. मात्र पूर्णा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन व बेपर्वा वृत्तीमुळे कागदावरच मायनर साफ झाली. पाणीपाळी दिल्यानंतर नियोजनानुसार प्रत्येक मायनरवरून वितरिकेद्वारे शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याची जवाबदारी असते. मात्र यावेळी पाणी नियोजन काय असते? हेच माहिती नसल्यासारखी अवस्था आहे. सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडले ते वाट फुटेल तसे वाहत आहे. मायनरला दरवाजेच नाहीत. त्यामुळे मुख्य कालव्यांवर असलेल्या मायनरमधून थेट चाऱ्यांमध्ये व चाऱ्या गाळांनी भरलेल्या असल्याने थेट रस्त्यावर पाणी असे चित्र आहे. 

१५ ते २० दिवसांची पाणीपाळी देण्यात येत आहे. हे २० दिवसही पाणी नको असेल तरी शेतापर्यंत पोहोचत आहे. चाऱ्या फोडून रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. बीबीसी कालव्यावर असलेल्या जवळा मायनरला दरवाजे भसल्याने पहिल्या पाळीमधील पाण्याची प्रचंड नासाडी झाली.आता तिसऱ्यांदा पाणी आले तरीही दरवाजे नसल्याने पाणी अखंडपणे वाया जाणे सुरूच आहे. पाणी मागणी अर्ज नाहीत, शेतकऱ्यांकडून मागणी नाही. सध्या पाण्याची आवश्यकता नाही तरीसुद्धा पाणीपाळी देण्यामागचा हेतूच समजत नाही. 

आजपर्यंत पाण्याअभावी होरपळल्या गेले व आता पाणी वाया जात असल्याचे पाहून शेतकरी आचंबित आहेत. कोणी तरी पाणी वाचवा हो, असा धावा करत आहेत. मात्र पूर्णा प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी व अभियंते नांदेडहून कारभार पाहत असल्याने वाया जाणारे पाणी पाहत हळहळ व्यक्त करण्याशिवाय पर्याय नाही. कागदावर कालवे स्वच्छ करण्यात कोणाला किती लाभ झाला, शासनाच्या तिजोरीला किती चुना लागला याचा हिशोब चौकशी झाल्यावर लागेल मात्र वाया गेलेले पाणी पुन्हा परत येणार नाही. त्यामुळे दरवाजे बसवा मगच पाणी सोडा, अशी मागणी होत आहे. असेच पाणी वाया जात राहीले तर सहा महिन्यांतच दोन्ही धरणे रिकामी होण्यास वेळ लागणार नाही. 

दरवाजांना पैसे देण्याची शेतकऱ्यांची तयारीमायनरला दरवाजे बसविण्यासाठी पूर्णा प्रकल्पाकडे पैसे नसतील तर जवळा मायनरला दरवाजा बसवण्यासाठी स्वत: खर्च करण्याची तयारी शेतकरी सुभाष भोपाळे यांनी दर्शविली. दरवाजा बसवा खर्च देतो, असा निरोप शाखा अभियंत्यांनाही दिला. तरीही तिसऱ्या पाळीला दरवाजा न बसवताच पाणी सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ४शाखा अभियंता पठाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की , मायनरला दरवाजे नाहीत, हे सत्य आहे. दरवाजे नसल्याने पाणी वाया जात आहे, हेसुद्धा खरे आहे. मात्र मागणी करूनही दरवाजे बसवलेले नाहीत. त्यामुळे अडचण असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी वाया जात आहे हे मान्य करणारे दरवाजे न बसवता पाणी का सोडत आहेत, हे कोडे आहे. 

टॅग्स :WaterपाणीHingoliहिंगोलीFarmerशेतकरीagricultureशेती