शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी परीक्षा देण्यालाही आता ६- ९ संधीचे बंधन, विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:25 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ६ - ९ संधीचे बंधन घालण्यात आले आहेत. यासंबंधीचा निर्णय ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ६ - ९ संधीचे बंधन घालण्यात आले आहेत. यासंबंधीचा निर्णय ३० डिसेंबर रोजी घेण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या संधी मर्यादित करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ वाढल्याच्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. एमपीएससी आयोगाने अचानक हा निर्णय घेतल्याने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमधून हा निर्णय चुकीचा असल्याचे बोलल्या जात आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६ संधी तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना ९ संधी असा भेद का? असे बाेलले जात आहे. सर्व प्रवर्गातील उमेदवारांना एकच न्याय देण्याची मागणीही विद्यार्थ्यांतून होत आहे.

परीक्षा वेळेत होत नाहीत

एमपीएससीने कमाल संधीचा निर्णय घेतला आहे. मात्र, आयोगाकडून वेळेच्या वेळी परीक्षा होत नसल्याने अनेक विद्यार्थी परीक्षा जाहिरातीच्या प्रतीक्षेत असतात. यामुळे आयोगाच्या वतीने वेळेत जाहिराती काढून परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. तसेच मंत्र्याकडून यावर्षी परीक्षा घेण्याचे आश्वासने दिली जातात ,पण ते वर्ष अजूनही आले नाही.

संदीप हराळ, हिंगोली

वेळेवर निकालही लागत नाहीत

एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा वेळेत होत नाहीत. तसेच त्यांचे निकालही वेळेवर लागत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना निकालाच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. त्यातच आयोगाच्या वतीने कमाल संधीचा निर्णय घेण्यात आल्याने बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

आकाश भगत, हिंगोली

या निर्णयामुळे अनेकांमध्ये गोंधळाची स्थिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर एमपीएससीने कमाल संधीचा निर्णय घेतल्यामुळे परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच या परीक्षेत भाग घेतल्यास एक पेपरला उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजल्या जात असल्याने अनेकांमधून नाराजी व्यक्त हाेत असल्याने हा निर्णय याेग्य वेळी घेणे गरजेचा हाेता.

कैलास बेंद्रे, हिंगोली

उमेदवारांना एकच न्याय द्यावा

एमपीएससी आयोगाने ६-९ संधीचे बंधन घालून दिल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या आदेशातील किचकट निर्णयामुळे अनेकांना संधी घालवावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचण येत असल्याने सर्व प्रवर्गातील उमेदवारांना एकच न्याय देण्याची गरज आहे.

प्रदीप कावरखे, गोरेगाव