शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांचा निधी अडकला सदस्यांच्या वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST

हिंगोली जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून मिळणारा निधी दोन वर्षांत खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, विविध विभागांना बांधकामासाठी मिळणारा ...

हिंगोली जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून मिळणारा निधी दोन वर्षांत खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, विविध विभागांना बांधकामासाठी मिळणारा निधी खर्च होणे हे बांधकाम विभागाच्याच हातात असते. २०१९-२० मधील अनेक विभागांच्या कामांकडे बांधकाम विभागाने निधी परत जाण्याची नामुष्की ओढवली आहे. यात महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाड्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

२०१९-२० मध्ये ३५ अंगणवाड्यांची कामे मंजूर केली होती. यासाठी २.९७ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. मात्र, यापैकी १८ कामेच पूर्ण झाली आहेत. काही कामांच्या तर निविदाच काढल्या नव्हत्या. त्यामुळे ही कामेच झाली नसल्याने निधी तसाच पडून राहिला होता. आता या कामांना दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर २०२०-२१ मधील कामे गेल्यावर्षीच मान्यता मिळाल्यानंतरही अजून सुरू नाहीत. यात २२ नवीन अंगणवाड्यांचे बांधकाम होणार असून सात ते आठ कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. मात्र, २६३ अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचे काम लटलकलेले आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेनंतर याच्या निविदाच काढल्या जात नाहीत.

काय आहे अडचण

या कामांबाबत पदाधिकारी व सदस्यांमध्ये बेबनाव आहे. तालुक्याचे, सर्कलचे की गावनिहाय टेंटर काढायचे? यावरून वाद झडताहेत. त्यामुळे यंदाही या कामांचा २.६३ कोटींचा निधी परत गेला तर आश्चर्य नाही. या वादात प्रशासनही हातावर हात धरून बसत असून त्यांच्यावर निधी खर्च करण्याची जबाबदारी आहे की नाही? हा प्रश्नच आहे.

बांधकाम विभागाला पत्र दिले

याबाबत महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांना विचारले असता नवीन अंगणवाड्यांची कामे सुरू झाली. मात्र, दुरुस्तीची कामे बाकी आहेत. जुन्या व नव्या सर्व कामांसाठी बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. निधी अखर्चित राहिला तर तोच विभाग जबाबदार राहील.

यंदा पुन्हा ४ कोटी

सध्या शासनाने जिल्हा नियोजनचा पूर्ण निधी दिला जाणार नसल्याचे सांगितल्याने यंदाच्या ४ कोटींचे नियोजन रखडलेले आहे. यात पूर्ण निधी मिळालाच तर गेल्यावर्षीचे दायित्व, ३० टक्के कोविड आदी वगळता एखादा कोटीपेक्षा जास्त निधी नियोजनात येऊ शकतो, तर दीडपट केल्यास १.८० कोटींपर्यंत नियोजन करता येऊ शकते.